शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार?

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2023 11:35 IST

आमचा हक्क, आमचं पाणी :कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते.

छत्रपती संभाजीनगर : कृष्णा खोऱ्यांतर्गत मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेले २३.६६ टीएमसी पैकी केवळ ७ टीएमसी पाणी दिले जाते. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी तातडीने शासनाने देण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव टाकणे गरजेचे आहे.

कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातील ७६ टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्यात तर २४ टक्के कृष्णा खोऱ्यात येते. जस्टीस बच्छावत लवादानुसार कृष्णा खोऱ्याचा महाराष्ट्रात २८ टक्के, कर्नाटकमध्ये ४६ टक्के तर तेलंगणा राज्यात २६ टक्के हिस्सा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा तर मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते. मात्र, जलसंपदाच्या आकडेवारीचा विचार करता कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाची सरासरी टक्केवारी ४२.४५ टक्के आहे. तर धाराशिव जिल्ह्यात १९.३६ टक्के तर बीड जिल्ह्यात १७.६९ टक्के एवढेच आहे. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांचा वाटा ४८.५ टीएमसी आहे.

आतापर्यंत प्रत्यक्षात २५.४ टीएमसी पाणी मिळाले आहे. उर्वरित २३.१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृष्णा खोऱ्याचे २३.६६ टीएमसी पाणी मंजूर केले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करता तत्कालीन राज्य सरकारने २००७ साली कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यासाठी १९ टीएमसी पाणीच उपलब्ध असल्याचे नमूद केले. मात्र, या निर्णयाचा मराठवाड्यातील नेत्यांनी विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने सुधारित आराखडा तयार केला, यानंतर २७ ऑगस्ट २००९ रोजी २३.६६ टीएमसी पाण्याला मंजुरी दिली. मात्र, हे पाणी मंजूर करताना मराठवाड्याला ७ टीएमसीपर्यंतच पाणी देण्याबाबत निर्बंध घातले. परिणामी, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मराठवाडावासीयांना कृष्णा खाेऱ्याकडून हक्काचे आणखी १६.६६ टीएमसी पाण्याची प्रतीक्षा आहे.

शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये असलेल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील सिंचन क्षमता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याएवढी करण्याची जबाबदारी शासनाची आहे. सिंचनाची तूट भरून काढण्यासाठी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातील २३.६६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी शासनास हा निर्णय घेण्यास भाग पाडावे.-डॉ. शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ तथा सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणी