शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार?

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2023 11:35 IST

आमचा हक्क, आमचं पाणी :कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते.

छत्रपती संभाजीनगर : कृष्णा खोऱ्यांतर्गत मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेले २३.६६ टीएमसी पैकी केवळ ७ टीएमसी पाणी दिले जाते. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी तातडीने शासनाने देण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव टाकणे गरजेचे आहे.

कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातील ७६ टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्यात तर २४ टक्के कृष्णा खोऱ्यात येते. जस्टीस बच्छावत लवादानुसार कृष्णा खोऱ्याचा महाराष्ट्रात २८ टक्के, कर्नाटकमध्ये ४६ टक्के तर तेलंगणा राज्यात २६ टक्के हिस्सा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा तर मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते. मात्र, जलसंपदाच्या आकडेवारीचा विचार करता कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाची सरासरी टक्केवारी ४२.४५ टक्के आहे. तर धाराशिव जिल्ह्यात १९.३६ टक्के तर बीड जिल्ह्यात १७.६९ टक्के एवढेच आहे. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांचा वाटा ४८.५ टीएमसी आहे.

आतापर्यंत प्रत्यक्षात २५.४ टीएमसी पाणी मिळाले आहे. उर्वरित २३.१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृष्णा खोऱ्याचे २३.६६ टीएमसी पाणी मंजूर केले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करता तत्कालीन राज्य सरकारने २००७ साली कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यासाठी १९ टीएमसी पाणीच उपलब्ध असल्याचे नमूद केले. मात्र, या निर्णयाचा मराठवाड्यातील नेत्यांनी विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने सुधारित आराखडा तयार केला, यानंतर २७ ऑगस्ट २००९ रोजी २३.६६ टीएमसी पाण्याला मंजुरी दिली. मात्र, हे पाणी मंजूर करताना मराठवाड्याला ७ टीएमसीपर्यंतच पाणी देण्याबाबत निर्बंध घातले. परिणामी, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मराठवाडावासीयांना कृष्णा खाेऱ्याकडून हक्काचे आणखी १६.६६ टीएमसी पाण्याची प्रतीक्षा आहे.

शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये असलेल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील सिंचन क्षमता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याएवढी करण्याची जबाबदारी शासनाची आहे. सिंचनाची तूट भरून काढण्यासाठी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातील २३.६६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी शासनास हा निर्णय घेण्यास भाग पाडावे.-डॉ. शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ तथा सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणी