शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

समांतर योजनेच्या पॅकअपनंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:59 IST

शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीमुळे नवीन योजना जाहीर करण्यास वेळ मिळणे कठीण शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो

औरंगाबाद : शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना जेमतेम १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, अशा बिकट स्थितीत शहरात ९ वर्षांपासून चर्चेत असलेली समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र, आगामी निवडणुकीमुळे किमान सहा महिने तरी राज्य शासनाला नवीन योजना जाहीर करायला वेळ नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता महापालिके कडून होणारा पाणीपुरवठा आजघडीला अपुरा पडत आहे. शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी समांतर योजनेकडे नागरिकांचे डोळे लागले होते.  त्यादृष्टीने समांतर योजनेची मार्च २०११ मध्ये निविदा मंजूर झाली होती. मात्र, अनेक गोंधळ, वादात एक-एक वर्ष उलटून गेली. गेल्या ९ वर्षांत पाणी तर मिळालेच नाही. शासनाकडे नव्याने योजना मागण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने समांतरच्या कंपनीसोबत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहे. समांतरच्या कंपनीनेदेखील अटी मान्य होणार नसतील, तर आम्ही काम करणार नाही, असे लेखी कळविले. त्यानंतर मनपाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजनेला गुंडाळण्यावर १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. समांतर जलवाहिनीसाठी कें द्र्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे १४० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आले आहे. मनपाकडून शासनाकडे नव्या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे; परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच आचारसंहिताही लागणार आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत तरी प्रस्तावाला मंजुरी मिळणे अशक्य दिसते. निवडणुकीच्या व्यापात राज्य शासनाला शहरासाठी नवीन योजना जाहीर करण्यासाठी फुरसत नाही. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष काम होऊन शहरात वाढीव पाणी येण्यासाठी किती वर्षे लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना किमान तीन वर्षे तरी सध्या मिळणाऱ्या पाण्यातच भागवावे लागणार असल्याचे दिसते.उन्हाळ्यात पाण्यासाठी चटकेइतक्या वर्षात समांतर योजना पूर्ण करून शहरात मुबलक पाणी देणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके बसू लागतात. यंदाही हीच परिस्थिती राहणार आहे. कारण शहरातील पाणीपुरवठा आताच विस्कळीत झालेला आहे. काही वॉर्डांमध्ये चार दिवसाआड तर काही वॉर्डांत पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एन-५, एन-७ येथील पाण्याच्या टाक्या उशिरा भरल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होत आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे आणखी हाल होणार आहेत. समांतर योजना पूर्ण होऊ शकली नाही, हेच यासाठी कारणीभूत ठरले आहे.दररोज पाणी स्वप्नवतगेल्या अनेक वर्षांपासून समांतर योजनेच्या नावाखाली शहरवासीयांना दररोज पाणी देण्याची स्वप्नेच दाखविण्यात आली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मुबलक पाणीपुरवठ्याचा मुद्दा वापरण्यात आला. प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहराजवळ जायकवाडी धरण असूनही शहरापर्यंत पाणी पोहोचविण्याची नवीन व्यवस्था महापालिका उभी करू शकत नाही.............

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका