शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

समांतर योजनेच्या पॅकअपनंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:59 IST

शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीमुळे नवीन योजना जाहीर करण्यास वेळ मिळणे कठीण शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो

औरंगाबाद : शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना जेमतेम १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, अशा बिकट स्थितीत शहरात ९ वर्षांपासून चर्चेत असलेली समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र, आगामी निवडणुकीमुळे किमान सहा महिने तरी राज्य शासनाला नवीन योजना जाहीर करायला वेळ नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता महापालिके कडून होणारा पाणीपुरवठा आजघडीला अपुरा पडत आहे. शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी समांतर योजनेकडे नागरिकांचे डोळे लागले होते.  त्यादृष्टीने समांतर योजनेची मार्च २०११ मध्ये निविदा मंजूर झाली होती. मात्र, अनेक गोंधळ, वादात एक-एक वर्ष उलटून गेली. गेल्या ९ वर्षांत पाणी तर मिळालेच नाही. शासनाकडे नव्याने योजना मागण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने समांतरच्या कंपनीसोबत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहे. समांतरच्या कंपनीनेदेखील अटी मान्य होणार नसतील, तर आम्ही काम करणार नाही, असे लेखी कळविले. त्यानंतर मनपाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजनेला गुंडाळण्यावर १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. समांतर जलवाहिनीसाठी कें द्र्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे १४० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आले आहे. मनपाकडून शासनाकडे नव्या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे; परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच आचारसंहिताही लागणार आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत तरी प्रस्तावाला मंजुरी मिळणे अशक्य दिसते. निवडणुकीच्या व्यापात राज्य शासनाला शहरासाठी नवीन योजना जाहीर करण्यासाठी फुरसत नाही. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष काम होऊन शहरात वाढीव पाणी येण्यासाठी किती वर्षे लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना किमान तीन वर्षे तरी सध्या मिळणाऱ्या पाण्यातच भागवावे लागणार असल्याचे दिसते.उन्हाळ्यात पाण्यासाठी चटकेइतक्या वर्षात समांतर योजना पूर्ण करून शहरात मुबलक पाणी देणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके बसू लागतात. यंदाही हीच परिस्थिती राहणार आहे. कारण शहरातील पाणीपुरवठा आताच विस्कळीत झालेला आहे. काही वॉर्डांमध्ये चार दिवसाआड तर काही वॉर्डांत पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एन-५, एन-७ येथील पाण्याच्या टाक्या उशिरा भरल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होत आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे आणखी हाल होणार आहेत. समांतर योजना पूर्ण होऊ शकली नाही, हेच यासाठी कारणीभूत ठरले आहे.दररोज पाणी स्वप्नवतगेल्या अनेक वर्षांपासून समांतर योजनेच्या नावाखाली शहरवासीयांना दररोज पाणी देण्याची स्वप्नेच दाखविण्यात आली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मुबलक पाणीपुरवठ्याचा मुद्दा वापरण्यात आला. प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहराजवळ जायकवाडी धरण असूनही शहरापर्यंत पाणी पोहोचविण्याची नवीन व्यवस्था महापालिका उभी करू शकत नाही.............

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका