शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

बिल वेळेत भरूनही लाइट जात असेल तर काय करायचे साहेब?

By साहेबराव हिवराळे | Updated: September 8, 2023 19:00 IST

मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारनियमन वाढले आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यात वाढलेल्या विजेच्या मागणीचा व उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी महावितरणला काही ठिकाणी नाइलाजास्तव आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. मात्र हे भारनियमन तात्पुरते आहे.

मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने दिवसभर भारनियमन झालेले नाही. ही परिस्थिती अशीच राहावी, अशी इच्छा विनाकारण उकाडा सहन करणाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात विजेची मागणी किती?राज्यात शुक्रवारी सकाळी विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॅट होती. जवळपास ८०० ते ९०० मेगावॅटचे सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.

उपलब्ध वीज किती?४ हजार ३०० मेगावॅट होती. त्यात ९०० मेगावॅटचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे. पाऊस नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.

शहरात एक तास, ग्रामीण भागात चार तासांपर्यंत भारनियमनघरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर सर्व वीज ग्राहकांनी विशेषतः सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री १० या कमाल मागणीच्या कालावधीत विजेचे भारनियमन तर शहरात सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.

वीजगळती जास्त, तिथे भारनियमन जास्तभारनियमनाचीही वर्गवारी केली असून, सी कॅटेगिरीतील नागरिकांना अधिक फटका बसत आहे.

बिल भरूनही त्रास का?नियमित वीज बिल अदा करणाऱ्यांना भारनियमनाने त्रस्त करणे योग्य नाही. आम्ही आंदोलन छेडणार आहोत.- महेंद्र साळवे

डेंग्यूची लागण झाल्यास...?बिल अदा करूनही उपकरणे बंद असल्याने डेंग्यूची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण?- हरिभाऊ राठोड

शनिवारी पाऊस पडल्याने रविवारी वीज सुरळीतपावसाने ओढ दिल्याने विजेची मागणी वाढली. ती पूर्ण करण्यासाठी वरूनच हा निर्णय होता; परंतु शनिवारच्या पावसामुळे रविवारी सुरळीत वीजपुरवठा होता.- महावितरण अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादelectricityवीजRainपाऊस