शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:18 IST

शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.

ठळक मुद्देमहावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवरून ग्राहकाला अजब उत्तर

औरंगाबाद : शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य लढत बुधवारी झाली. हा सामना शेवटच्या टप्प्यावर असताना भारत पराभूत होतो का विजयी होतो, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली होती. नेमक्या त्या वेळी शहरात पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पावसाच्या आगमनाने विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उल्कानगरी परिसरातील वीजही गुल झाली होती. त्यामुळे रहिवासी सचिन ताम्हाणे यांनी महावितरणच्या ०२४०-२२४०१०८ या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला व ‘वीज कधी येणार’,अशी विचारणा के ली; परंतु समोरून मिळालेले उत्तर ऐकून ते चक्रावून गेले. ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असा उलट प्रश्न त्यांना करण्यात आला. या प्रकाराविषयी ताम्हाणे यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. मात्र, या क्रमांकावर कोण-कोण बोलतात, हे सांगता येणार नाही. दुपारपर्यंत नियमित कर्मचारी असतात. त्यानंतर लाईन स्टाफ असतो. मी सबस्टेशन आॅपरेटर आहे. याविषयी मला काही सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले.अपेक्षित उत्तर मिळावेदोष असून वीज येण्यास वेळ लागेल अथवा काही मिनिटांत वीज येईल, असे उत्तर देणे अपेक्षित असते; परंतु अजब उत्तर देण्यात आले. अनेकदा तर दूरध्वनी उचलला जात नाही.-सचिन ताम्हाणे, वीज ग्राहक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणRainपाऊस