शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यास काय? जलसंपदा विभागाचे तब्बल ४० कोटी रुपये थकले

By मुजीब देवणीकर | Updated: April 25, 2024 15:28 IST

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते. मागील काही वर्षांपासून मनपाने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने ४० कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठरावीक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही. जलसंपदा विभाग मूळ रक्कम आणि थकबाकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करीत आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी महापालिकेने करार केला आहे. करारात दरवर्षी किती रक्कम द्यावी, हेसुद्धा नमूद आहे. दर सहा वर्षांनंतर सुधारित करार करावा लागतो. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मनपाने जलसंपदा विभागाला ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा केली आहे.

३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असा आग्रह जलसंपदा विभागाने धरला होता. फेब्रुवारी महिन्यातच मनपाला नोटीसही बजावण्यात आली होती. मनपाकडून थकबाकी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून कधीही कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ शकतो. यापूर्वी जलसंपदा विभागाने मनपाला नोटीस देऊन दररोज काही तास पाण्याचा उपसाही बंद केला होता. ही नामुष्की टाळण्यासाठी मनपाने काही पैसे भरून कारवाई टाळली होती. आता पुन्हा जलसंपदा विभागाकडून अचानक अशा पद्धतीची कारवाई झाल्यास शहराचा पाणीपुरठा बंद होऊ शकतो. अगोदरच शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी