शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील उच्च शिक्षणाची परिस्थिती नेमकी कशी? छत्रपती संभाजीनगरातील तीन प्राध्यापक शोधणार

By राम शिनगारे | Updated: December 9, 2023 17:13 IST

आंतरराष्ट्रीय प्रकल्पास दिल्लीच्या संस्थेचे सहकार्य

छत्रपती संभाजीनगर : भारतातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी लंडन येथील वारविक विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन (एनआयईपीए) नवी दिल्ली या दोन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशातील सहा विद्यापीठे निवडली आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील दोन प्राध्यापिका आणि देवगिरी महाविद्यालयात एका प्राध्यापकाची निवड केली आहे.

विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. धनश्री महाजन यांच्या नेतृत्वात विभागातीलच डॉ. कृतिका खंदारे आणि देवगिरी महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. विष्णू पाटील यांची टीम महाराष्ट्रातून निवडली आहे. लंडनच्या वारविक विद्यापीठातील प्रो. एमिली एफ. हेंडरसन आणि एनआयईपीएच्या प्रो. निधी एस. सभरवाल यांनी देशातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गळतीसह इतर प्रकारच्या अभ्यासासाठी सहा राज्यांतील सहा विद्यापीठांची नुकतीच निवड केली. त्यात महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह हरियाणा, केरळ, ओडिशा, आसाम आणि छत्तीसगड राज्यातील प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. हा संशोधन प्रकल्प तब्बल पाच वर्षे चालणार आहे. लंडनच्या विद्यापीठाच्या पुढाकारातील प्रस्तुत संशोधनासाठी निवड झालेल्या या तीन प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र.कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ आणि कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी अभिनंदन केले. दरम्यान, निवड झालेल्या तीन प्राध्यापकांना नुकतेच नवी दिल्ली येथे संशोधनासाठी प्रशिक्षणही दिले आहे.

२०३५ पर्यंत ५० टक्क्यांचे टार्गेटनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०३५ पर्यंत उच्च शिक्षणातील प्रवेशाचे एकूण नोंदणी प्रमाण (जीईआर) ५० टक्क्यांपर्यंत घेऊन जायचे आहे. सध्या ते २५.८ टक्के एवढे अत्यल्प आहे. येत्या १२ वर्षांत २४.०२ टक्के एवढ्या वाढीसाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. सध्या १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ २५.५ टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात. त्यातील गळतीचे प्रमाणही मोठे आहे. गळतीचे प्रमाण थांबवून उच्च शिक्षणातील प्रवेशाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या बाबींची होणार तपासणीप्रस्तुत संशोधनात उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जबाबदार असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्याशिवाय आरक्षण धोरण, रिक्त पदे, वंचित घटकांतील सदस्यांची निवड, कायमस्वरुपी प्राध्यापक व तासिका तत्त्वावरील प्राध्यापक, शहर व ग्रामीण भागातील प्राध्यापकांसह विद्यार्थी, महाविद्यालयांची परिस्थिती आदींविषयी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून विस्तृत संशोधन केले जाणार आहे. त्या आधारावर आगामी काळातील उच्च शिक्षणातील धोरणांमध्ये बदल, परदेशी विद्यापीठांचा भारतातील प्रवेश निश्चित होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण