शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 1, 2024 11:33 IST

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष?

छत्रपती संभाजीनगर : मनुस्मृती फाडली जाते, जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? मनृस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? मनुस्मृती ज्यावेळी लिहिण्यात आली, तेव्हा एकट्या ब्राह्मणानेच लिहिली नाही. जे जे मनू होऊन गेले, ते सर्व ब्राह्मणच होते, यावर विश्वास असण्याचे कारण नाही. त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, अशी रोखठोक भूमिका खा. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात मांडली. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ऊठसूट विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे आता थांबवा, असा इशाराही त्यांनी दिला.

अ. भा. पेशवा संघटनेच्या तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातून ब्रह्मवृंद दाखल झाला होता. खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाची आजची परिस्थिती व राजकीय स्वार्थापायी राजकारणाकडून सतत समाजावर होणारी टीका, यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

महात्मा गांधींची हत्या केली एकाने, समाज दोषी कसा?महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? मात्र, संपूर्ण ब्राह्मणांवर त्याचा राग काढण्यात आला, समाजाला वाळीत टाकण्यात आले. अजूनही विरोधी राजकारणी समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी त्या घटनेवरून ब्राह्मण समाजावर टीका करतात. हे किती दिवस सहन करायचे? हे थांबले पाहिजे, असेही खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

शेंडी, जाणव्यावर टिंगल करणाऱ्यांची वृत्तीआम्ही शेंडी, जाणव्याचे हिंदुत्व मानत नाही, असे लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, शेंडी, जाणव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही आहे. हिंदू धर्मात असे अनेक समाज, पंथ आहेत ज्यात संस्कार, विधी म्हणून शेंडी ठेवली जाते व जाणवे घातले जाते. एकटा ब्राह्मण समाजच नाही. समाजा-समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या अशा राजकारणी मनोवृत्तीला कायमचे मिटवा, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व समाजांनी एकत्र यावेहिंदू म्हणजे एकटा ब्राह्मण नव्हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदू व नंतर ब्राह्मण, मराठा व विविध जातीपंथातील आहोत. यामुळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmedha kulkarniमेधा कुलकर्णीBJPभाजपा