शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 13:56 IST

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

ठळक मुद्देपॅनल बोर्डमध्ये एका उंदराने केबल कुरतडली होती.उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करणार्‍या विद्युत मोटारीजवळील पॅनल बोर्डमध्ये एका उंदराने गुरुवारी पहाटे केबल कुरतडली. त्यानंतर शॉक लागून उंदीरही मेला. शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण केबल जळाली. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाला केबल बदलणे आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल चोवीस तास लागले. शुक्रवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहानिशा केली असता, एका उंदराने केबल कुरतडली होती. उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली. या भागातील ट्रान्सफाॅर्मर सुद्धा खराब झाला होता. उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून त्याची चाचणी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पंपिंग सुरू करून पाणी उपसा सुरू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरातील जलकुंभांत पाणी पडले. यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत जलकुंभ भरल्यानंतर मागील बुधवारी व गुरुवारी सिडको-हडकोसह ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी दिवसभरात बहुतांश वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

शहरात तीव्र पाणीटंचाईबुधवारी, गुरुवारी ज्या वसाहतींमध्ये पाणी आले नाही, तेथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना शुक्रवारी एकसारखे फोन करून, आज आमच्या वसाहतीत पाणी येणार की नाही, अशी विचारणा केली. तसेच काही नागरिकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले. दरम्यान, मध्य मतदारसंघाचे आ. प्रदीप जैस्वाल यांनीही कार्यकारी अभियंता धांडे यांना फोन करून पाण्याविषयी विचारणा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका