शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘कृत्रिम’ पावसाच्या प्रयोगातून हाती काय लागले?; अद्याप प्रयोगाची सांगता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:47 IST

३० कोटी रुपयांचा खर्च, आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेचे लक्ष नाही

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनच्या विमानाने १२ आॅक्टोबरपर्यंत उड्डाणावर उड्डाण घेतले, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडलेला पाऊस हा कृत्रिम होता की नैसर्गिक, याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सगळे काही हवेत असल्याप्रमाणेच आहे.

३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात सुरू आहे. आॅक्टोबर संपत आला तरी अजून प्रयोगाची सांगता झालेली नाही. कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले गेले तरी त्यातून खूप काही हाती लागलेले नाही. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली जात आहे. ७८ दिवसांत २६ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढग नसल्याच्या कारणाने उड्डाण घेतले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. १६ आॅक्टोबर रोजी ६० दिवस झाले. ८ दिवस सुटीचे वगळले, तर ८ आॅक्टोबरलाच ५२ दिवस संपले. ९ आॅगस्टपासून हिशोब केला, तर आजवर ७८ दिवस प्रयोग झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर १४३ फ्लेअर्स, १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरपर्यंत ३४१ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.

औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.प्रयोग कधी थांबणार?शासनाकडून प्रयोग बंद करण्याबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. ज्यादिवशी प्रयोग बंद करण्याबाबत अधिकृत सूचना येतील, त्यादिवशी सर्वांना कळविण्यात येईल, असे विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस