शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘कृत्रिम’ पावसाच्या प्रयोगातून हाती काय लागले?; अद्याप प्रयोगाची सांगता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:47 IST

३० कोटी रुपयांचा खर्च, आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेचे लक्ष नाही

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनच्या विमानाने १२ आॅक्टोबरपर्यंत उड्डाणावर उड्डाण घेतले, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडलेला पाऊस हा कृत्रिम होता की नैसर्गिक, याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सगळे काही हवेत असल्याप्रमाणेच आहे.

३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात सुरू आहे. आॅक्टोबर संपत आला तरी अजून प्रयोगाची सांगता झालेली नाही. कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले गेले तरी त्यातून खूप काही हाती लागलेले नाही. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली जात आहे. ७८ दिवसांत २६ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढग नसल्याच्या कारणाने उड्डाण घेतले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. १६ आॅक्टोबर रोजी ६० दिवस झाले. ८ दिवस सुटीचे वगळले, तर ८ आॅक्टोबरलाच ५२ दिवस संपले. ९ आॅगस्टपासून हिशोब केला, तर आजवर ७८ दिवस प्रयोग झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर १४३ फ्लेअर्स, १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरपर्यंत ३४१ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.

औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.प्रयोग कधी थांबणार?शासनाकडून प्रयोग बंद करण्याबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. ज्यादिवशी प्रयोग बंद करण्याबाबत अधिकृत सूचना येतील, त्यादिवशी सर्वांना कळविण्यात येईल, असे विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस