शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

बक्षीस कशाचे? सत्कार केला ना!; महानगरपालिकेकडून गुणवंतांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:18 IST

 मनपाने घोषित केलेले रोख बक्षीस तीन वर्षांनंतरही दिले नाही

ठळक मुद्दे ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्येही गुणवंत विद्यार्थी घडावेत यादृष्टीने प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावली होती. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे घोषित केले होते. तीन वर्षे उलटली तरी एकाही गुणवंताला मनपाने बक्षीस दिले नाही. उलट ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या बहुतांश शाळा पूर्वी आठवीपर्यंतच होत्या. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून महापालिकेने दहावीपर्यंत शिक्षण देणे सुरू केले. गुणवत्ता यादीत एकही विद्यार्थी झळकत नव्हता. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारा मनपाचा एकही विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले. ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले. २०१६-१७ या  शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल सहापेक्षा अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. महापालिकेने त्यांचा गौरव करून रोख बक्षीसही प्रत्येकी दिले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात नारेगाव मनपा शाळेच्या उर्दू आणि मराठीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करून बक्षिसावर दावा केला. 

आठ ते दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदर शाळेकडे बक्षिसाचा तगादा लावला. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने पुढील शिक्षणासाठी हातभार लागेल म्हणून पालकांनी मनपा प्रशासन, महापौर, नगरसेविका यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी  यांनी विद्यार्थी, पालकांना सांगितले की, ‘तुमचा फुलांनी सत्कार केला, हेच खूप झाले’ बक्षीस वगैरे काहीच मिळणार नाही. मनपाने विद्यार्थ्यांसोबत उघडपणे भेदभाव केल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. मनपा प्रशासन बक्षीस देणार नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने मनपासमोर उपोषण करणार असा इशाराही पालकांनी दिला आहे.

आता फक्त कौतुक होणार...पहिल्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे बक्षीस दिले. ८९.९ टक्के गुण घेणाऱ्याला बक्षीस दिल्या जात नव्हते. एका मार्कसाठी आमच्या मुलावर अन्याय का? असा प्रश्न पालक उपस्थित करीत होते. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार बक्षीस देणे बंद केले. विद्यार्थ्यांचे फक्त कौतुक केल्या जाते. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको म्हणून बक्षीस देणे बंद केले.- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळा