शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बक्षीस कशाचे? सत्कार केला ना!; महानगरपालिकेकडून गुणवंतांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:18 IST

 मनपाने घोषित केलेले रोख बक्षीस तीन वर्षांनंतरही दिले नाही

ठळक मुद्दे ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्येही गुणवंत विद्यार्थी घडावेत यादृष्टीने प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावली होती. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे घोषित केले होते. तीन वर्षे उलटली तरी एकाही गुणवंताला मनपाने बक्षीस दिले नाही. उलट ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या बहुतांश शाळा पूर्वी आठवीपर्यंतच होत्या. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून महापालिकेने दहावीपर्यंत शिक्षण देणे सुरू केले. गुणवत्ता यादीत एकही विद्यार्थी झळकत नव्हता. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारा मनपाचा एकही विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले. ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले. २०१६-१७ या  शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल सहापेक्षा अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. महापालिकेने त्यांचा गौरव करून रोख बक्षीसही प्रत्येकी दिले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात नारेगाव मनपा शाळेच्या उर्दू आणि मराठीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करून बक्षिसावर दावा केला. 

आठ ते दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदर शाळेकडे बक्षिसाचा तगादा लावला. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने पुढील शिक्षणासाठी हातभार लागेल म्हणून पालकांनी मनपा प्रशासन, महापौर, नगरसेविका यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी  यांनी विद्यार्थी, पालकांना सांगितले की, ‘तुमचा फुलांनी सत्कार केला, हेच खूप झाले’ बक्षीस वगैरे काहीच मिळणार नाही. मनपाने विद्यार्थ्यांसोबत उघडपणे भेदभाव केल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. मनपा प्रशासन बक्षीस देणार नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने मनपासमोर उपोषण करणार असा इशाराही पालकांनी दिला आहे.

आता फक्त कौतुक होणार...पहिल्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे बक्षीस दिले. ८९.९ टक्के गुण घेणाऱ्याला बक्षीस दिल्या जात नव्हते. एका मार्कसाठी आमच्या मुलावर अन्याय का? असा प्रश्न पालक उपस्थित करीत होते. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार बक्षीस देणे बंद केले. विद्यार्थ्यांचे फक्त कौतुक केल्या जाते. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको म्हणून बक्षीस देणे बंद केले.- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळा