शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

बक्षीस कशाचे? सत्कार केला ना!; महानगरपालिकेकडून गुणवंतांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:18 IST

 मनपाने घोषित केलेले रोख बक्षीस तीन वर्षांनंतरही दिले नाही

ठळक मुद्दे ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्येही गुणवंत विद्यार्थी घडावेत यादृष्टीने प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावली होती. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे घोषित केले होते. तीन वर्षे उलटली तरी एकाही गुणवंताला मनपाने बक्षीस दिले नाही. उलट ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या बहुतांश शाळा पूर्वी आठवीपर्यंतच होत्या. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून महापालिकेने दहावीपर्यंत शिक्षण देणे सुरू केले. गुणवत्ता यादीत एकही विद्यार्थी झळकत नव्हता. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारा मनपाचा एकही विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले. ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले. २०१६-१७ या  शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल सहापेक्षा अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. महापालिकेने त्यांचा गौरव करून रोख बक्षीसही प्रत्येकी दिले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात नारेगाव मनपा शाळेच्या उर्दू आणि मराठीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करून बक्षिसावर दावा केला. 

आठ ते दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदर शाळेकडे बक्षिसाचा तगादा लावला. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने पुढील शिक्षणासाठी हातभार लागेल म्हणून पालकांनी मनपा प्रशासन, महापौर, नगरसेविका यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी  यांनी विद्यार्थी, पालकांना सांगितले की, ‘तुमचा फुलांनी सत्कार केला, हेच खूप झाले’ बक्षीस वगैरे काहीच मिळणार नाही. मनपाने विद्यार्थ्यांसोबत उघडपणे भेदभाव केल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. मनपा प्रशासन बक्षीस देणार नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने मनपासमोर उपोषण करणार असा इशाराही पालकांनी दिला आहे.

आता फक्त कौतुक होणार...पहिल्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे बक्षीस दिले. ८९.९ टक्के गुण घेणाऱ्याला बक्षीस दिल्या जात नव्हते. एका मार्कसाठी आमच्या मुलावर अन्याय का? असा प्रश्न पालक उपस्थित करीत होते. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार बक्षीस देणे बंद केले. विद्यार्थ्यांचे फक्त कौतुक केल्या जाते. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको म्हणून बक्षीस देणे बंद केले.- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळा