शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

By सुमित डोळे | Updated: June 26, 2024 15:12 IST

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा,

छत्रपती संभाजीनगर : आठ वर्षांपूर्वी शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यानंतर शहरात अनेक विकासकामे सुरू झाल्याचा दावा मनपाने केला. जी-२० दरम्यान शहराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, शहराची वाहतूक व्यवस्थेवर खर्चासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी विभागाला सपशेल विसर पडला. स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीची धुरा असलेली सिग्नल तब्बल ३० वर्ष जुनाट व निष्क्रिय झालेली आहे. परिणामी, संपूर्ण शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असताना मनपाला मात्र त्याचे सोयरसुतक नाही, हे विशेष.

जून २०१५ मध्ये लाँच झालेल्या स्मार्ट सिटी मिशनद्वारे नागरिकांना मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ वातावरण, स्मार्ट जीवनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रतिवर्ष सुमारे १०० कोटींचा निधी यातून शहरांना देण्याचे नियोजित होते. शहरात स्मार्ट सिटी योजनेतून ७०० कोटींपेक्षा अधिक मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांनी दाखवले. मात्र, यात शहराची प्रतिमा अवलंबून असलेल्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. पोलिसांच्या मते, वाहनांची संख्या लोकसंख्येच्या ६० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकीकडे शहरात वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असताना तुलनेत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रभावी व्यवस्थाच उभी केली गेली नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली.

यासाठी इच्छाशक्तीच नाहीराज्यातील अन्य स्मार्ट सिटी असलेल्या वाहतूक समिती कार्यरत आहे. त्यात मनपा आयुक्त, अभियंत्यांसह, वाहतूक अभियंत्यांचा समावेश असतो. ठराविक कालावधीनंतर या समितीची बैठक होऊन शहराच्या वाहतूक समस्यांवर चर्चा व उपाययोजना ठरवले जाते. शहरात मात्र मनपाकडे वाहतूक अभियंता असे पदच नाही. शिवाय, गेल्या तीन वर्षांपासून मनपा प्रशासक वा अन्य अधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या समस्यांसाठी एकही बैठक बोलावली नाही.

अशी आहे सिग्नलची अवस्था :येथे ३० वर्षे जुने सिग्नल-बाबा पेट्रोल पंप, पंचवटी, नगरनाका, हॉटेल अमरप्रीत, मोंढा नाका, आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, जुने हायकोर्ट, हॉटेल कार्तिकी, मिल कॉर्नर, रेल्वेस्टेशन चौक, सिल्लेखाना, समर्थनगर, जुब्ली पार्क, बलवंत चौक, क्रांतीचौक, महानुभव आश्रम, नवीन हायकोर्ट चौक, एस.बी.ओ.ए. चौक, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, एन-१ चौक, टी. व्ही. सेंटर चौक, शरद टी पॉईंट, बजरंग चौक, आंबेडकर चौक.

२०१५ मध्ये नवे ९ सिग्नल१९९४-९५ नंतर शहरात २०१५ मध्ये ९ नवे सिग्नल बसवण्यात आले. यात चंपा चौक, रोपळेकर रुग्णालय, शहानूर मिया दर्गा चौक, बी. एस. एन. एल. चौक, जवाहरनगर पोलिस ठाणे चौक, सेव्हनहिल उड्डाणपूल, सिटी क्लब, कोकणवाडी, चिश्तिचा चौकाचा समावेश करण्यात आला.

केवळ २ स्मार्ट सिग्नलशहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबलेली असताना स्मार्ट सिटीकडून केवळ ओखार्ड चौक व मिलिंद चौकात अद्ययावत प्रणालीचे सिग्नल बसवण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अन्यत्र दुरुस्ती देखील नीट केली गेली नाही.

साधे टाईमरही नाही-४० सिग्नलपैकी २१ सिग्नलमध्ये टाइमर बंद आहे.-८ सिग्नलमध्ये टाइमर प्रणालीच नाही.-३८ सिग्नलमध्ये साधा फ्रि लेफ्ट टर्न लॅम्प नाही.

वाहनांची संख्या अचंबित करणारी-२०१९ मध्ये १३ लाख ६८ हजार वाहने. -२०२३-२४ मध्ये ८२ हजार ७२७ वाहनांची भर.-मे, २०२४ पर्यंत १६ लाख ७० हजार वाहनांची नोंद.-महिन्याला सरासरी सात हजार वाहनांची भर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी