शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 19:43 IST

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले

औरंगाबाद : मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांना शहरातील काही लोकप्रतिनिधी, नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. १६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच केंद्र शासनानेही यात लक्ष घालावे, यासाठीही राज्यपाल पत्रव्यवहार करणार आहेत.

गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांचे शहरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वागत केले. नंतर राज्यपालांनी सुभेदारी विश्रामगृहात रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मानव विकास मिशन विभागाची बैठक घेतली. त्यांना भाजपचे शिष्टमंडळही भेटले. शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा योजना, महिला सुरक्षा या मुद्द्यांबाबत निवेदन दिले.

औरंगाबादला जागतिक पातळीवर महत्त्व आहे ते पर्यटनस्थळांमुळे. त्यात वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद लेण्यांसह इतर पर्यटनस्थळांचे मोठे नाव आहे. जगभर ख्याती असलेल्या शहराला आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत? त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यपालांसमोर केले. यात इको बटालियन, वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील राज्यपालांनी माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी राज्यपाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला भेट देणार आहेत.

घरकुल योजनेला मिळेना जागापंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आ. सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, लता दलाल, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रारही या शिष्टमंडळाने केली. घरकुल योजनेबाबत राज्यपाल सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. सावेंनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी