शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 19:43 IST

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले

औरंगाबाद : मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांना शहरातील काही लोकप्रतिनिधी, नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. १६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच केंद्र शासनानेही यात लक्ष घालावे, यासाठीही राज्यपाल पत्रव्यवहार करणार आहेत.

गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांचे शहरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वागत केले. नंतर राज्यपालांनी सुभेदारी विश्रामगृहात रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मानव विकास मिशन विभागाची बैठक घेतली. त्यांना भाजपचे शिष्टमंडळही भेटले. शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा योजना, महिला सुरक्षा या मुद्द्यांबाबत निवेदन दिले.

औरंगाबादला जागतिक पातळीवर महत्त्व आहे ते पर्यटनस्थळांमुळे. त्यात वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद लेण्यांसह इतर पर्यटनस्थळांचे मोठे नाव आहे. जगभर ख्याती असलेल्या शहराला आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत? त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यपालांसमोर केले. यात इको बटालियन, वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील राज्यपालांनी माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी राज्यपाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला भेट देणार आहेत.

घरकुल योजनेला मिळेना जागापंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आ. सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, लता दलाल, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रारही या शिष्टमंडळाने केली. घरकुल योजनेबाबत राज्यपाल सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. सावेंनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी