शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 19:43 IST

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले

औरंगाबाद : मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांना शहरातील काही लोकप्रतिनिधी, नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. १६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच केंद्र शासनानेही यात लक्ष घालावे, यासाठीही राज्यपाल पत्रव्यवहार करणार आहेत.

गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांचे शहरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वागत केले. नंतर राज्यपालांनी सुभेदारी विश्रामगृहात रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मानव विकास मिशन विभागाची बैठक घेतली. त्यांना भाजपचे शिष्टमंडळही भेटले. शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा योजना, महिला सुरक्षा या मुद्द्यांबाबत निवेदन दिले.

औरंगाबादला जागतिक पातळीवर महत्त्व आहे ते पर्यटनस्थळांमुळे. त्यात वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद लेण्यांसह इतर पर्यटनस्थळांचे मोठे नाव आहे. जगभर ख्याती असलेल्या शहराला आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत? त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यपालांसमोर केले. यात इको बटालियन, वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील राज्यपालांनी माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी राज्यपाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला भेट देणार आहेत.

घरकुल योजनेला मिळेना जागापंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आ. सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, लता दलाल, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रारही या शिष्टमंडळाने केली. घरकुल योजनेबाबत राज्यपाल सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. सावेंनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी