शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 11:40 IST

आजारी असल्यास ‘प्रिस्क्रिप्शन’ही जोडावी लागते

ठळक मुद्देचालक- वाहकांना सुटीसाठी द्यावा लागतो कारणांचा पुरावा

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : एसटी महामंडळातील चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली, तर त्या कारणाचा पुरावा दिल्यानंतरच सुटी मंजूर होते. नातेवाईकांचे असो की, खुद्द स्वत:चे लग्न, आजारापण अशा अनेक कारणांसाठी रजा घेताना पुरावा द्यावा लागतो. त्यामुळे सुटीसाठी रजेच्या अर्जासोबत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन, रेल्वेचे तिकीट, लग्नपत्रिका, अशा अनेक बाबी जोडण्याची दुर्दैवी वेळ चालक- वाहकांवर येत आहे. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान एसटी महामंडळातील चालकाच्या भावाचा १४ मे रोजी मृत्यू झाला. मात्र, अंत्यविधीसाठी सुटी मंजूर करून घेण्यासाठी भावाचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेने सिडको बसस्थानकात घेऊन येण्याची वेळ चालकावर ओढावली. या घटनेविषयी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतून हळहळ आणि प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांवर ही वेळ का ओढावत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. तेव्हा चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली तर ती मंजूर करून घेण्यासाठी काय करावे लागते, याचा उलगडा झाला. 

एखाद्या कारणासाठी सुटी लागत असेल तर चालक-वाहक आगार व्यवस्थापकांकडे अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणासाठी रजा, सुटी मागितली जात आहे, याची पडताळणी केली जाते. कर्मचाऱ्याने ज्या कारणासाठी सुटी मागितली ते कारण योग्य असेल तरच रजा मंजूर केली जाते. त्यामुळे त्याचा पुरावाच देण्याची वेळ चालक-वाहकांवर येते. नातेवाईकांचे लग्न असेल तर लग्नपत्रिका अर्जासोबत जोडावी लागते. अचानक एखाद्या दिवशी आजारामुळे कामावर गैरहजर राहिल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा पुरावाही द्यावा लागतो. काही कामानिमित्त प्रवास करणे गरजेचे असेल आणि तो प्रवास रेल्वेने होणार असेल तर रेल्वेच्या तिकिटाची प्रत पुरावा म्हणून द्यावी लागते. जे कारण असेल ते खरे असल्याचा एकप्रकारे पुरावाच द्यावा लागत असल्याचे चालक-वाहकांनी सांगितले. 

प्रवाशांच्या सेवेत कायम तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गरजेचे आणि अडचणीच्या वेळेस सुटी मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अर्जासोबत पुरावा जोडण्याची ही पद्धत कोणत्याही अन्य प्रशासकीय सेवेत नाही. त्यामुळे महामंडळातील ही परिस्थिती दूर करण्याची गरज आहे. अन्यथा यापुढेही एखाद्या कर्मचाऱ्याला सुटीसाठी नातेवाईकाचा मृतदेह दाखविण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

स्वत:च्या लग्नाचीही पत्रिकाचालक-वाहकांना स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी चक्क लग्नाची पत्रिका अर्जासोबत द्यावी लागते. ‘लोकमत’ने पाहणी केली तेव्हा स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी एका कर्मचाऱ्याला अर्जासोबत लग्नपत्रिका जोडावी लागल्याचे आढळून आले.  लग्नाची पत्रिका जोडल्यानंतर मोजक्याच सुट्या मिळतात. अवघ्या काही दिवसांत पुन्हा कर्तव्यावर हजर राहण्याच्या अटीवरच रजा मंजूर केली जाते.

अधिक पुष्टी मिळतेरजेसाठी जे कारण अर्जात नमूद केलेले असते, त्या कारणाला अधिक पुष्टी मिळावी, यासाठी चालक-वाहकच लग्नपत्रिका जोडतात. तसे काही त्यांना बंधनकारक नाही. रेल्वेचे तिकीट, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन अशी काहीही कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. आजारपणासंदर्भातील सुटीसाठी मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते.- किशोर सोमवंशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

टॅग्स :state transportएसटीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानकAurangabadऔरंगाबाद