शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'आमच्याच घरी झालो आम्ही पाहुणे'; सून जेवण देत नाही, मुलगा काही बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 11:35 IST

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते.

ठळक मुद्देलॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली.ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेक जण संपर्क साधत आहेत

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : आमचे हात- पाय आता थकले. मुलगा आणि सुनेवर आम्ही पूर्णपणे अवलंबून आहोत. मात्र सून आम्हाला विचारत नाही, औषध- जेवण वेळेवर देत नाही आणि मुलगा मात्र काहीच न बोलता मूग गिळून  गप्प बसतो, अशा तक्रारी  घेऊन  येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये लक्षणीय वाढले आहे. 

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले की त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळते आणि ज्येष्ठांना घरात मुक्त श्वास घेता येतो. परंतु लॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली. याचीच परिणीती म्हणून पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात येणाऱ्या तक्रारी वाढल्याचे दिसते.

जवळपास सर्व तक्रारींचे निवारणजेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यापैकी ७५ टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. समुपदेशनाने या सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेक जण संपर्क साधत असून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. संवाद खुंटणे आणि  एकमेकांना समजून न घेणे, हेच या सगळ्या तक्रारींचे मुळ आहे. प्राप्त तक्रारीतून हा निष्कर्ष निघाला आहे.

कुटुंबियांकडून दुर्लक्षआपण म्हातारे झालो, म्हणजे आता कुटुंबीयांसाठी निरूपयोगी ठरतो आहोत, ही भावना ज्येष्ठांच्या मनात बळावत आहे. कामाचा ताण, सोशल मीडियामुळे स्वत:भोवती निर्माण झालेले आभासी जग यामुळे तरूणाईला आपल्या सभोवतालच्या माणसांचा विसर पडतो. यातूनच संवाद खुंटतो आणि दोन पिढ्यांमध्ये  अंतर  निर्माण होते.  पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये फोनद्वारे तक्रारी येण्याचे प्रमाण अधिक आहे.  मात्र लेखी स्वरूपात तक्रार देणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तक्रार आल्यानंतर जेव्हा समुपदेशनासाठी बोलविले जाते, तेव्हा मुलगा, सून यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. मुलाने घर बळकावले, माझ्याच घरातून मला बाहेर काढले, आमच्या घरात परके झालो आहोत, सून आमच्याशी बोलत नाही, सून विचारत नाही, घरात आमच्याशी कुणी बोलत नाही, अशा ज्येष्ठांकडून येणाऱ्या तक्रारी अगदीच कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. बऱ्याचदा एकमेकांमध्ये कमी होत चाललेला संवाद हेच या तक्रारींचे खरे कारण असते. वृद्धांकडूनही काही चुका होत असतील, पण तरूणांनी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस