शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्याच घरी झालो आम्ही पाहुणे'; सून जेवण देत नाही, मुलगा काही बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 11:35 IST

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते.

ठळक मुद्देलॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली.ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेक जण संपर्क साधत आहेत

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : आमचे हात- पाय आता थकले. मुलगा आणि सुनेवर आम्ही पूर्णपणे अवलंबून आहोत. मात्र सून आम्हाला विचारत नाही, औषध- जेवण वेळेवर देत नाही आणि मुलगा मात्र काहीच न बोलता मूग गिळून  गप्प बसतो, अशा तक्रारी  घेऊन  येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये लक्षणीय वाढले आहे. 

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले की त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळते आणि ज्येष्ठांना घरात मुक्त श्वास घेता येतो. परंतु लॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली. याचीच परिणीती म्हणून पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात येणाऱ्या तक्रारी वाढल्याचे दिसते.

जवळपास सर्व तक्रारींचे निवारणजेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यापैकी ७५ टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. समुपदेशनाने या सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेक जण संपर्क साधत असून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. संवाद खुंटणे आणि  एकमेकांना समजून न घेणे, हेच या सगळ्या तक्रारींचे मुळ आहे. प्राप्त तक्रारीतून हा निष्कर्ष निघाला आहे.

कुटुंबियांकडून दुर्लक्षआपण म्हातारे झालो, म्हणजे आता कुटुंबीयांसाठी निरूपयोगी ठरतो आहोत, ही भावना ज्येष्ठांच्या मनात बळावत आहे. कामाचा ताण, सोशल मीडियामुळे स्वत:भोवती निर्माण झालेले आभासी जग यामुळे तरूणाईला आपल्या सभोवतालच्या माणसांचा विसर पडतो. यातूनच संवाद खुंटतो आणि दोन पिढ्यांमध्ये  अंतर  निर्माण होते.  पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये फोनद्वारे तक्रारी येण्याचे प्रमाण अधिक आहे.  मात्र लेखी स्वरूपात तक्रार देणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तक्रार आल्यानंतर जेव्हा समुपदेशनासाठी बोलविले जाते, तेव्हा मुलगा, सून यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. मुलाने घर बळकावले, माझ्याच घरातून मला बाहेर काढले, आमच्या घरात परके झालो आहोत, सून आमच्याशी बोलत नाही, सून विचारत नाही, घरात आमच्याशी कुणी बोलत नाही, अशा ज्येष्ठांकडून येणाऱ्या तक्रारी अगदीच कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. बऱ्याचदा एकमेकांमध्ये कमी होत चाललेला संवाद हेच या तक्रारींचे खरे कारण असते. वृद्धांकडूनही काही चुका होत असतील, पण तरूणांनी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस