शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत; सुषमा अंधारे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:07 IST

केंद्र सरकारने राज्यपाल दिलेत की, ठरवून महाराष्ट्राची बदनामी करणारे भाजप कार्यकर्ते  

औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद आता उमटत असून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना काम करण्यापेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणे जास्त आवडते. त्यांच्या विधानाने कायम महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. माझी तथाकथित महाशक्ती आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, आम्हाला राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी,'आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत व्यक्त केले. यावरून आता वादंग उठले असून अनेकांनी राज्यपालांवर टीका केली आहे. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याचे पालक म्हणून काम करण्यापेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणे जास्त आवडते. त्यांच्या विधानाने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. कायम महाराष्ट्रावर टीका केली. येथील महापुरुषांना कमी लेखले आहे. यापूर्वी देखील त्यांनी शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते फुले दाम्पत्य, मराठी माणसावर टीका केली आहे. माझी तथाकथित महाशक्ती आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, आम्हाला राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत. केंद्र सरकारने राज्यपाल नेमून दिलेत कि ठरवून टीका करणारा तुमचा माणूस पाठवला आहे, असा सवाल ही अंधारे यांनी केला. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSushma Andhareसुषमा अंधारेAurangabadऔरंगाबाद