शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:58 IST

जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकण्यासाठी मनपाच्या तिजोरीत पैसे नाहीत. शहर सेफ्टिक टँकमुक्त करण्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहेत. या योजनेतही मनपाला २६५ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. त्याशिवाय केंद्र, राज्य शासन पैसेच देणार नाही. त्यामुळे जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही. आम्ही घेतो तुम्ही (भावी नगरसेवक) फेडत बसा, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून सातारा देवळाईसह शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहेत. सातारा-देवळाई येथे जवळपास ७० टक्के काम पूर्णही झाले आहे. उर्वरित प्रकल्प सुरू असून, प्रकल्पासाठी जवळपास ८८७ कोटी रुपये खर्च लागणार आहे. या योजनेत मनपाला ३० टक्के स्वहिस्सा म्हणून २६५ कोटी रुपयांचा निधी टाकावा लागणार आहे.

मनपाची आर्थिक परिस्थिती सर्वश्रुत आहे. योजनेत स्वहिस्सा तर टाकावा लागणारच आहे. त्यामुळे प्रशासनासमोर कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने हमी घेत वित्तीय संस्थेकडून ८२२ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून तयारी सुरू केली. आता ड्रेनेजसाठी २६५ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. १ हजार ८७ रुपयांचे कर्ज घेतले तरी परतफेड येणाऱ्या काही वर्षांत करावी लागेल. पुढील काही वर्षे मनपात येणाऱ्या नगरसेवकांना विकासकामांसाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका