शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:58 IST

जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकण्यासाठी मनपाच्या तिजोरीत पैसे नाहीत. शहर सेफ्टिक टँकमुक्त करण्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहेत. या योजनेतही मनपाला २६५ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. त्याशिवाय केंद्र, राज्य शासन पैसेच देणार नाही. त्यामुळे जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही. आम्ही घेतो तुम्ही (भावी नगरसेवक) फेडत बसा, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून सातारा देवळाईसह शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहेत. सातारा-देवळाई येथे जवळपास ७० टक्के काम पूर्णही झाले आहे. उर्वरित प्रकल्प सुरू असून, प्रकल्पासाठी जवळपास ८८७ कोटी रुपये खर्च लागणार आहे. या योजनेत मनपाला ३० टक्के स्वहिस्सा म्हणून २६५ कोटी रुपयांचा निधी टाकावा लागणार आहे.

मनपाची आर्थिक परिस्थिती सर्वश्रुत आहे. योजनेत स्वहिस्सा तर टाकावा लागणारच आहे. त्यामुळे प्रशासनासमोर कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने हमी घेत वित्तीय संस्थेकडून ८२२ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून तयारी सुरू केली. आता ड्रेनेजसाठी २६५ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. १ हजार ८७ रुपयांचे कर्ज घेतले तरी परतफेड येणाऱ्या काही वर्षांत करावी लागेल. पुढील काही वर्षे मनपात येणाऱ्या नगरसेवकांना विकासकामांसाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका