शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:49 PM

सामाजिक जोखडाला झुगारून देत युवक युवतींचा धाडसी निर्णय

ठळक मुद्देशरीरापेक्षा विचार सक्षम असणे गरजेचे असल्याचे जोडीदारांचे मतशासनाकडूनही राबविण्यात येत आहेत प्रोत्साहनपर विविध योजना

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : विवाह दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण. विवाह म्हटला की, मुला-मुलींसाठी स्थळ पाहणी करताना शिक्षण, नोकरी, घराणे याबरोबरच वय, उंची आणि सौंदर्याकडे आजही चौकसपणे पाहिले जाते. शोभेशी उंची नसली तरी नकार दिला जातो. सामाजिक जोखडाला झुगारून देत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ४६ सुदृढ युवक-युवतींनी दिव्यांगांना आपले जीवनसाथी करून आनंदाने संसार फुलवला.

परंपरेने रूढ जोडीदार निवडीचे अनेक निकष आजही पाळले जातात. उपवरांचे वय, उंची, शिक्षण याबाबत पुरुष हा स्त्रियांपेक्षा वरचढ असावा अशीच परंपरा आहे. पुढे कुळ, गोत्र, सौंदर्य, शिक्षण, घराणे, पगार, नोकरी अथवा व्यवसाय, सामाजिक स्तर, संपत्ती, शेती, वगैरे गोष्टी तपासल्या जातात. या सगळ्यानंतर जन्मपत्रिका जुळते का? हे पाहूनच विवाहाची पुढची पायरी गाठली जाते. मात्र, या सगळ्या गोष्टींना छेद देत अनेकांनी भावी जोडीदार म्हणून दिव्यांगांची निवड केली. 

कुटुंबियांचे पाठबळलग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन, दो हंसो का जोडा असे म्हटले जाते; परंतु भिन्न परिस्थिती असेल तर विवाह जुळणे अशक्य होते. दिव्यांगांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेताना अनेकांना कुटुंबियांचे पाठबळ आणि एकमेकांच्या संमतीमुळेच विवाह जुळल्याचे काहींनी सांगितले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले, दिव्यांगांच्या विवाहाचा प्रश्न मोठा आहे. दिव्यांगत्व, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाने विवाहाचे प्रमाण कमीच आहे. दिव्यांग वधू-वरांच्या विवाहालादेखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

माझ्यापेक्षा ‘तिचा’ होकार ठरला महत्त्वपूर्णअपघातामुळे उजव्या पायाला दिव्यांगत्व आलेले विलास गायके यांचा वर्षभरापूर्वी गायत्री यांच्यासोबत विवाह झाला. विलास गायके म्हणाले, जेव्हा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहणी सुरू झाली, तेव्हा मी माझ्या होकारापेक्षा मुलीच्या होकाराला अधिक महत्त्व देण्याचा निश्चय केला होता. माझ्या दिव्यांगत्वाची कल्पना असूनही, गायत्रीने लग्नासाठी होकार दिला. तेव्हा तिने शरीर सक्षम असण्यापेक्षा विचार सक्षम पाहिजेत, असे म्हटले होते. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मला वाटते. आज आमचा संसार आनंदात सुरू आहे. माझे शिक्षण एम.ए.पर्यंत झालेले असून, मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे विलास गायके यांनी सांगितले.

शासनाचीही मदतदिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शासनाने दिव्यांग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहांना प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली. यात दिव्यांगाशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजार रुपये मदत केली जाते.४दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून आणि दिव्यांगांना कौटुंबिक जीवन सुलभ पार पाडता यावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ जणांनी दिव्यांगांसोबत विवाह केला, तर यावर्षी आतापर्यंत १३ जणांचा विवाह झाला. ४यामध्ये ८ जणांना योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. या योजनेची अनेकांना आजही कल्पना नाही. त्यामुळे दिव्यांगांसोबत केलेल्या विवाहांची संख्या अधिक असण्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivyangदिव्यांगmarriageलग्न