शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 7:43 PM

देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत.

ठळक मुद्देबामसेफच्या तीन दिवसीय अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ बामसेफच्या मंचावर आंबेडकर कसे? 

औरंगाबाद : आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो. देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत. आपण वर्तमानात जगत नाही. वर्तमानातूनच भविष्य बनत असते. भविष्यातून वर्तमान घडत नाही, असे मौलिक विचार शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. 

बीड बायपास रोडवरील वासंती मंगल कार्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या बामसेफच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ‘सामाजिक परिवर्तन फुले-आंबेडकरी मिशनसे, या दिशाहीन आंदोलनसे?’ असा या सत्राचा विषय होता. सकाळी पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पहिले सत्र सुरू झाले. 

पूज्य भदन्त खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.देशाला व संविधानालाही वाचवावयाचे आहे. कारण संविधान संपुष्टात आणण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे. याविरुद्धची लढाई प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन भदन्त खेमधम्मो यांनी केले, तर पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांनी, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राबाहेर पडावे. उत्तर प्रदेश त्यांची वाट पाहत आहे, असे साकडे घातले. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची एनआरसी व सीएएबद्दलची रोखठोक भूमिका समोर आलेली आहे. आजही ते या मुद्यावर पोटतिडकीने बोलत होते. एनआरसी कायदा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. उपस्थितांमधून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. फक्त दोन-तीन जणांनी हात वर केले. हे पाहून प्रकाश आंबेडकर  अवाक् झाले. मग हे अधिवेशन कशासाठी? इतिहासात रममाण होण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी, बामसेफच्या कॅडर कॅम्पमधून नेते का तयार होत नाहीत, असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले.

प्रारंभी, नेहा राव, सत्यप्रकाश बौद्ध व डॉ. जितेंद्र बौद्ध यांनी क्रांतिगीते गायिली. के. बी. दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अतरवीरसिंह यांचेही यावेळी भाषण झाले.

बामसेफच्या मंचावर आंबेडकर कसे? बामसेफच्या मंचावर प्रकाश आंबेडकर कसे, अशी चर्चा आजही होत होती. यासंदर्भात बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. बी. दिवेकर यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीही बामसेफच्या मंचावर आंबेडकरांना आणले होते व ते आले होते. बामसेफचे अन्य गट प्रकाश आंबडेकर व भिक्खू संघालाही मानत नाहीत. आम्ही या दोघांनाही मानतो. त्यामुळे बामसेफच्या मंचावर आंबेडकरांचे येणे यात गैर काहीच नाही. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद