शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

मनपानेच लावली रस्त्यांची ‘वाट’

By admin | Updated: July 17, 2016 00:34 IST

औरंगाबाद : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील खड्ड्यांचा प्रश्न राज्यस्तरीय बनतो. महापालिकाही अत्यंत तत्परतेने प्रमुख रस्त्यांची डागडुजी करते.

औरंगाबाद : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील खड्ड्यांचा प्रश्न राज्यस्तरीय बनतो. महापालिकाही अत्यंत तत्परतेने प्रमुख रस्त्यांची डागडुजी करते. पावसाळा निघून गेल्यावर खड्ड्यांची तीव्रताही कमी होते. त्यानंतर हा विषय थांबतो. १५ लाख नागरिकांना खड्ड्यांमध्ये आदळआपट करायला लावणाऱ्या महापालिकेतील अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत नाही. रस्त्यांच्या कामांना भ्रष्टाचाराची लागलेली कीड जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत शहर खड्ड्यांमध्येच राहणार हेसुद्धा निश्चित.शहरातील रस्त्यांच्या कामांवर दरवर्षी मनपातर्फे १८ ते २० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. यामध्ये विविध वॉर्डांमधील अंतर्गत रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. प्रमुख रस्ते अनेक नगरसेवकांच्या हद्दीतून जातात, त्यामुळे त्यांचे पुनर्डांबरीकरण, डागडुजी कधी तरी होते. ज्या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त आहे, त्या रस्त्यांची बांधणी अत्यंत दर्जेदार असावी हे शाळेतील लहान मुलालाही कळते. महापालिकेतील ‘तज्ज्ञ’अधिकाऱ्यांना हे साधे गणित मागील ३० वर्षांमध्ये कधीच समजलेले नाही. जेवढ्या वेळेस रस्ता खराब होईल, तेवढ्यांदा आपली मलाई घट्ट, अशी मानसिकता अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांमध्ये फोफावली आहे. जेव्हा जेव्हा रस्त्यांची गुणवत्ता क्वालिटी कंट्रोलकडून तपासण्याचा मुद्या समोर आला तेव्हा अधिकाऱ्यांनीच याला बगल दिली. क्वालिटी कंट्रोलच्या नावाने अधिकाऱ्यांचा एवढा थरकाप का उडतो...! गुणवत्तेची तपासणी झाल्यास अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे पितळ उघडे पडेल ही मुख्य भीती भ्रष्ट यंत्रणेला भेडसावत असते. शहरातील प्रमुख २० रस्त्यांचा आढावा घेतला असता त्यावर सुमारे २ लाखांहून अधिक खड्डे पाहायला मिळतील. शहराला खड्ड्यात घालण्याचे ‘महापाप’करणाऱ्या महापालिकेची स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी कशी निवड होऊ शकते...! समजा योगायोगाने निवड झालीच तर भ्रष्टाचाराचा राक्षस अंगात भिनलेले अधिकारी आणि कर्मचारी योजनेची स्मार्ट ‘वाट’लावणार....! क्रमश: