शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

‘नांमका’तून पाणी नगरकरांना दिले; पण गंगापूर, वैजापूरसाठी नकारघंटा

By बापू सोळुंके | Updated: May 8, 2024 14:12 IST

नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून एक्स्प्रेस कालव्याद्वारे गंगापूर, वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील काही गावांना पाणीपुरवठा होतो.

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू असताना दुसरीकडे मात्र त्याच प्रकल्पात पाणी नसल्याचे कारण देत गंगापूर, वैजापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना कळविले आहे.

नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून एक्स्प्रेस कालव्याद्वारे गंगापूर, वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील काही गावांना पाणीपुरवठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे वैजापूर, गंगापूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी केली होती. याविषयी कडाचे अधीक्षक अभियंता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी वैजापूर येथील नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून उपोषण सुरू केले होते.

सोमवारी कार्यकारी अभियंता आर. ए. गुजरे यांनी उपोषणकर्त्यांना पत्र दिले. यात नमूद केले की, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून देय असलेल्या ३११८ घनफूट पाण्यापेक्षा अधिक पाणी देण्यात आले आहे. आता प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे कळविले. तसेच ३ मेरोजी कार्यकारी संचालकांनी पाणी सोडण्याबाबत शासनास निर्णय घेण्याचा प्रस्तावाद्वारे कळविल्याचे सांगितले.

उपोषणकर्ते आधार शेतकरी जलदूत समितीचे पंडित शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘नांमका’तून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी दिले जात असताना दुसरीकडे मात्र मुद्दाम आम्हाला पाणी नाकारले जात आहे. दरवर्षी उन्हाळी पिकांना पाणी दिले जाते, म्हणून आम्ही फळबागा लावल्या, भाजीपाल्याचे पिके लावली आता पाणी नाकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय जनावरांच्या चारा, पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र