शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अंडरग्राऊंडमध्ये शिरले पाणी

By admin | Updated: June 25, 2014 01:29 IST

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले.

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले. अर्धा तास पाणी वाहून वाया गेल्यामुळे चार वॉर्डांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सादातनगर, राहुलनगर, हमालवाडा, रेल्वेस्टेशन परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला. वेदांतनगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आवारातील जलकुंभातून ती जलवाहिनी वरील वॉर्डांत जाते. जलवाहिनीचे पाणी सिद्धार्थ आर्केड या व्यापारी संकुलाच्या अंडरग्राऊंडमधील दुकानांमध्ये शिरले. दुकानातील पाणी दुपारी १ वाजेपर्यंत उपसून टाकण्यात येत होते. व्यापाऱ्यांनी या घटनेसाठी पालिकेला व कंत्राटदाराला दोषी धरले. का फुटली जलवाहिनीक्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ६०० मीटर अंतरातील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम १५ लाख रुपयांच्या खर्चातून सुरू आहे. २०० मीटरचे काम संपले आहे. आणखी ४०० मीटरचे काम बाकी आहे. पाणीपुरवठा बंद करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जलवाहिनीला जोड देऊन पाणीपुरवठा केला जात आहे. गोल्डी सिनेमागृहाजवळील जोड उच्चदाबामुळे निखळून पडला. त्यामुळे जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी खोदलेल्या आठ फूट खड्ड्यांमध्ये पाणी साचले. ते पाणी सिद्धार्थ आर्केड व लाभ चेंबर्सच्या अंडरग्राऊंडमध्ये शिरले. लाईनमनचा अंदाज चुकलाजलवाहिनीचा व्हॉल्व्ह उघडताना लाईनमनचा अंदाज चुकला. त्याने जी जलवाहिनी बंद आहे, तिचा व्हॉल्व्ह उघडला. तो व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडल्यामुळे पाणी प्रेशरने गेले आणि जोड निखळला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले. 1सिद्धार्थ आर्केडमध्ये तळघरात असलेल्या दुकानांमध्ये साचलेले पाणी असे मोटार लावून बाहेर काढण्यात आले.2तळघरात साचलेले पाणी.3जलवाहिती वळविण्याच्या कामात त्रुटी राहिल्याने परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले.व्यापारी म्हणतात लाखोंचे नुकसान मधुर मिलन मिठाई विके्रते बी. एच. राजपुरोहित म्हणाले, अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी किचनपर्यंत गेले. अंडरग्राऊंड वॉटरप्रूफ आहे. मनपाच्या व कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाणी आत शिरले. ट्रॅव्हल एजन्सीचे मालक आमेर हुसैनी म्हणाले, पाण्यामुळे संगणक खराब झाले. झेरॉक्स मशीनमध्ये पाणी गेले. नवीन फर्निचरचे काम सुरू होते. त्याचेही नुकसान झाले आहे.ज्यूस सेंटरचे मालक मन्नान खान म्हणाले, पाण्यामुळे फ्रीज जळाले आहे. पाण्यामुळे फरशी उखडून गेली. दुकानात २ फु टांपर्यंत पाणी झिरपून आले आहे. उपसण्यासाठी मशीन लावावी लागली. फास्ट फूड चालक ललित भंडारी म्हणाले, मनपाने कामाची नोटीस देणे गरजेचे होते. निष्काळजीपणे मनपाने काम केले. त्याचा भुर्दंड आमच्यासारख्या सामान्य व्यापाऱ्यांना बसला. हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न आहे.