शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी पळविण्याचा ‘उद्योग’; पाणी कधी आणि किती पोहोचणार याची प्रतीक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:47 IST

जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्गमात्र पाणी कधी पोहोचणार?

औरंगाबाद : जायकवाडीचे पाणी पळविण्याचा उद्योग गुरुवारीदेखील कायम राहिला. ओझर बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गात गुरुवारी ४५७ वरून १४७६ क्युसेकपर्यंत वाढ झाली; परंतु याठिकाणी डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग थांबलेला नव्हता. त्यामुळे जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भंडारदऱ्यातून १ हजार ५७४ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडून, निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. निळवंडेचा हा विसर्ग गुरुवारीही कायम होता. ओझर बंधाऱ्यातून बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीसाठी अवघ्या ४५७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नेवासामार्गे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. या दिवशी डाव्या कालव्यातून ८०५, तर उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. यामध्ये सायंकाळी उजवा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला; परंतु डाव्या कालव्यातील विसर्ग गुरुवारीही कायम होता. या कालव्यातून ८५० क्युसेकने विसर्ग सुरू होता.  

ओझर बंधाऱ्यातून बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली. सायंकाळपर्यंत १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूहोता. हा विसर्ग पाहता आता जायकवाडीला कधी आणि किती पाणी पोहोचणार,याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कालव्याला सोडण्यात आलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीच्या शक्यतेने जायकवाडीला पोहोचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. दरम्यान,  ओझर बंधारा येथील सुरूअसलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणी ओझर बंधारामार्गे शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नेवाशाला आज पोहोचणार

ओझर बंधारा येथील सुरू असलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पोहोचेल,असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. 

निळवंडेतून १.८० टीएमसीयापूर्वी नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच निळवंडेतून विसर्ग थांबविण्यात आला होता. केवळ रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले होते. हे रोटेशन संपल्यानंतरच म्हणजे बुधवारपासून निळवंडेतून पुन्हा विसर्ग झाला. निळवंडेतून १.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे; परंतु पाणी वळविण्याच्या प्रकारामुळे जायकवाडीत अपेक्षित पाणी पोहोचणार नसल्याचे दिसते.

आतापर्यंतची परिस्थितीनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत ८.९९ पैकी किमान ६ टीएमसी पाणी येणार होते. प्रत्यक्षात वरच्या भागात पाणी चोरीने जायकवाडी धरणात केवळ ३.८० टीएमसी पाणी पोहोचले आहे. प्रत्यक्षात २.२० टीएमसी पाणी आलेले नाही. जायकवाडीसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत ७.४७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. निळवंडेतून येणाऱ्या पाण्यानंतरही ६ टीएमसीचा पल्ला गाठणे अवघड दिसते. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाNashikनाशिकAhmednagarअहमदनगर