शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जायकवाडीचे पाणी पळविण्याचा ‘उद्योग’; पाणी कधी आणि किती पोहोचणार याची प्रतीक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:47 IST

जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्गमात्र पाणी कधी पोहोचणार?

औरंगाबाद : जायकवाडीचे पाणी पळविण्याचा उद्योग गुरुवारीदेखील कायम राहिला. ओझर बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गात गुरुवारी ४५७ वरून १४७६ क्युसेकपर्यंत वाढ झाली; परंतु याठिकाणी डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग थांबलेला नव्हता. त्यामुळे जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भंडारदऱ्यातून १ हजार ५७४ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडून, निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. निळवंडेचा हा विसर्ग गुरुवारीही कायम होता. ओझर बंधाऱ्यातून बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीसाठी अवघ्या ४५७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नेवासामार्गे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. या दिवशी डाव्या कालव्यातून ८०५, तर उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. यामध्ये सायंकाळी उजवा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला; परंतु डाव्या कालव्यातील विसर्ग गुरुवारीही कायम होता. या कालव्यातून ८५० क्युसेकने विसर्ग सुरू होता.  

ओझर बंधाऱ्यातून बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली. सायंकाळपर्यंत १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूहोता. हा विसर्ग पाहता आता जायकवाडीला कधी आणि किती पाणी पोहोचणार,याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कालव्याला सोडण्यात आलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीच्या शक्यतेने जायकवाडीला पोहोचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. दरम्यान,  ओझर बंधारा येथील सुरूअसलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणी ओझर बंधारामार्गे शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नेवाशाला आज पोहोचणार

ओझर बंधारा येथील सुरू असलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पोहोचेल,असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. 

निळवंडेतून १.८० टीएमसीयापूर्वी नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच निळवंडेतून विसर्ग थांबविण्यात आला होता. केवळ रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले होते. हे रोटेशन संपल्यानंतरच म्हणजे बुधवारपासून निळवंडेतून पुन्हा विसर्ग झाला. निळवंडेतून १.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे; परंतु पाणी वळविण्याच्या प्रकारामुळे जायकवाडीत अपेक्षित पाणी पोहोचणार नसल्याचे दिसते.

आतापर्यंतची परिस्थितीनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत ८.९९ पैकी किमान ६ टीएमसी पाणी येणार होते. प्रत्यक्षात वरच्या भागात पाणी चोरीने जायकवाडी धरणात केवळ ३.८० टीएमसी पाणी पोहोचले आहे. प्रत्यक्षात २.२० टीएमसी पाणी आलेले नाही. जायकवाडीसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत ७.४७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. निळवंडेतून येणाऱ्या पाण्यानंतरही ६ टीएमसीचा पल्ला गाठणे अवघड दिसते. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाNashikनाशिकAhmednagarअहमदनगर