शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पाणीपट्टी एक वर्षाची; पाणी ७ दिवसांआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 13:14 IST

नियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळ तज्ज्ञांचा मनपाला प्रस्तावसमन्यायी पाणी वाटपाची मागणी

औरंगाबाद : शहरातील नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि ७ दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठाकरायचा, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यासारखे आहे. समन्यायी पाणी वाटप व्हावे या हेतूने मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी महापालिका प्रशासनाला सूचना करणारा एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार प्रशासनाने बदल केले, तर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल. 

सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू आहे. आंदोलने, ठिय्या देणे, अभियंत्यांना मारहाण करणे, अशा घटना सध्या घडत आहेत; परंतु पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात कोणतेही यश येत नाही. गुंठेवारी वसाहतींमधून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत आहे, अशा परिस्थितीत विकास मंडळ सदस्य नागरे यांनी मनपा आयुक्तांना प्रस्ताव देऊन काही उपाय सुचविले आहेत.

शहरातील एकूण किती ईएसआरमधून नागरिकांना पाणीवाटप होते त्यांची संख्या पाहा. प्रत्येक ईएसआरखाली किती लोकसंख्या येते याची माहिती घ्या. प्रत्येक ईएसआरमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीसाठा करण्याची तरतूद करा. जसे की, ३ लाख लोकसंख्या असलेल्या ईएसआरमध्ये ३० एमएलडी पाणीसाठा करावा. शहरातील ८ लाख लोकसंख्या (५० टक्के) असलेल्या ईएसआरमध्ये पहिल्या दिवशी ८० एमएलडी पाणी साठवून ते नागरिकांना १ दिवसात पुरविले जावे. शहरात पैठण धरणावरून मिळणाऱ्या १२० एमएलडी पाण्यापैकी ८० एमएलडी पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरणे शक्य आहे. उरलेले ४० एमएलडी पाणी हॉटेल, उद्योग, कारखाने व अग्निशमन आणि इतर उपयोगासाठी ठेवता येईल. या पद्धतीने २ दिवसांत पूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होऊ शकेल. तसेच व्यावसायिक आणि इतर वापरासाठी देखील याच रोटेशनने पाणी देता येईल. २ दिवसांत २४० एमएलडी पाणी पालिका जायकवाडीतून शहरात आणते. त्यामुळे त्याचे वितरण साठवण करून केले जावे, अशा पद्धतीने पाणी वाटप केले गेल्यास शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. कारण १६ लाख शहराची लोकसंख्या असून, त्या लोकसंख्येला २४० एमएलडी पाणी सहज पुरविणे शक्य होईल. 

जनतेला वेठीस धरू नकानियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे. पाणी वाटप करण्यात अडचणी येत असल्यास चर्चा करून यावर मार्ग काढता येईल; परंतु पिण्याच्या पाण्यासाठी ७ दिवसांपर्यंत जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि पाणी असताना फक्त ४८ दिवस पाणीपुरवठा करायचा, हे धोरण चुकीचे असल्याचे नागरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी