शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी एक वर्षाची; पाणी ७ दिवसांआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 13:14 IST

नियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळ तज्ज्ञांचा मनपाला प्रस्तावसमन्यायी पाणी वाटपाची मागणी

औरंगाबाद : शहरातील नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि ७ दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठाकरायचा, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यासारखे आहे. समन्यायी पाणी वाटप व्हावे या हेतूने मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी महापालिका प्रशासनाला सूचना करणारा एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार प्रशासनाने बदल केले, तर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल. 

सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू आहे. आंदोलने, ठिय्या देणे, अभियंत्यांना मारहाण करणे, अशा घटना सध्या घडत आहेत; परंतु पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात कोणतेही यश येत नाही. गुंठेवारी वसाहतींमधून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत आहे, अशा परिस्थितीत विकास मंडळ सदस्य नागरे यांनी मनपा आयुक्तांना प्रस्ताव देऊन काही उपाय सुचविले आहेत.

शहरातील एकूण किती ईएसआरमधून नागरिकांना पाणीवाटप होते त्यांची संख्या पाहा. प्रत्येक ईएसआरखाली किती लोकसंख्या येते याची माहिती घ्या. प्रत्येक ईएसआरमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीसाठा करण्याची तरतूद करा. जसे की, ३ लाख लोकसंख्या असलेल्या ईएसआरमध्ये ३० एमएलडी पाणीसाठा करावा. शहरातील ८ लाख लोकसंख्या (५० टक्के) असलेल्या ईएसआरमध्ये पहिल्या दिवशी ८० एमएलडी पाणी साठवून ते नागरिकांना १ दिवसात पुरविले जावे. शहरात पैठण धरणावरून मिळणाऱ्या १२० एमएलडी पाण्यापैकी ८० एमएलडी पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरणे शक्य आहे. उरलेले ४० एमएलडी पाणी हॉटेल, उद्योग, कारखाने व अग्निशमन आणि इतर उपयोगासाठी ठेवता येईल. या पद्धतीने २ दिवसांत पूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होऊ शकेल. तसेच व्यावसायिक आणि इतर वापरासाठी देखील याच रोटेशनने पाणी देता येईल. २ दिवसांत २४० एमएलडी पाणी पालिका जायकवाडीतून शहरात आणते. त्यामुळे त्याचे वितरण साठवण करून केले जावे, अशा पद्धतीने पाणी वाटप केले गेल्यास शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. कारण १६ लाख शहराची लोकसंख्या असून, त्या लोकसंख्येला २४० एमएलडी पाणी सहज पुरविणे शक्य होईल. 

जनतेला वेठीस धरू नकानियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे. पाणी वाटप करण्यात अडचणी येत असल्यास चर्चा करून यावर मार्ग काढता येईल; परंतु पिण्याच्या पाण्यासाठी ७ दिवसांपर्यंत जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि पाणी असताना फक्त ४८ दिवस पाणीपुरवठा करायचा, हे धोरण चुकीचे असल्याचे नागरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी