शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:33 IST

गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.

करमाड : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी झाली असून, मिळेल तेथून अशुद्ध पाण्यावर ग्रामीण जनता तहान भागवत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद तालुक्यात १७४ गावे असून, या सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ११४ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या सर्व गावांची तहान २०२ शासकीय टँकरवर भागविण्यात येत आहे. तालुक्यातील ४ लाख १५ हजार लोकसंख्येला विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. तालुक्यातील सुखना व लाहुकी या मध्यम प्रकल्पांसह दहा लघु सिंचन तलाव कोरडे पडले आहेत.

त्यामुळे जनतेबरोबर जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील पूर्वेकडील १३४ गावांचे १४५ टँकर शेंद्रा एमआयडीसीमधील पॉइंटवर भरले जातात. परंतु शुक्रवारपासून यातील एकही टँकर पाण्याने भरून एकाही गावात आलेला नाही.तलाठी व ग्रामसेवक,कृषी सहाय्यक या शासकीय कर्मचाऱ्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी गावातच थांबावे, असा शासन आदेश आहे. परंतु तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेला या कर्मचारी दिसून आले नाहीत. तसेच गटविकास अधिकारी फोन उचलत नाहीत अशा असंख्य तक्रारी कोनेवाडी, दुधड, मंगरूळ, पिंपळखुटा आदी गावांतील सरपंचांनी केल्या आहेत.

लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू झाले नाही तर औरंगाबाद तालुक्यातून जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा लोकप्रतिनिधीनी दिला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात