शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:33 IST

गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.

करमाड : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील पुर्वेकडील १३४ गावांत पिण्याचा पाण्याचा एकही टँकर गेला नसून, पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात नसल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी झाली असून, मिळेल तेथून अशुद्ध पाण्यावर ग्रामीण जनता तहान भागवत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद तालुक्यात १७४ गावे असून, या सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ११४ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या सर्व गावांची तहान २०२ शासकीय टँकरवर भागविण्यात येत आहे. तालुक्यातील ४ लाख १५ हजार लोकसंख्येला विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. तालुक्यातील सुखना व लाहुकी या मध्यम प्रकल्पांसह दहा लघु सिंचन तलाव कोरडे पडले आहेत.

त्यामुळे जनतेबरोबर जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील पूर्वेकडील १३४ गावांचे १४५ टँकर शेंद्रा एमआयडीसीमधील पॉइंटवर भरले जातात. परंतु शुक्रवारपासून यातील एकही टँकर पाण्याने भरून एकाही गावात आलेला नाही.तलाठी व ग्रामसेवक,कृषी सहाय्यक या शासकीय कर्मचाऱ्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी गावातच थांबावे, असा शासन आदेश आहे. परंतु तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेला या कर्मचारी दिसून आले नाहीत. तसेच गटविकास अधिकारी फोन उचलत नाहीत अशा असंख्य तक्रारी कोनेवाडी, दुधड, मंगरूळ, पिंपळखुटा आदी गावांतील सरपंचांनी केल्या आहेत.

लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू झाले नाही तर औरंगाबाद तालुक्यातून जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा लोकप्रतिनिधीनी दिला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात