शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:56 IST

वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसत असून, गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात पूर्वी घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे ते जमिनीत पाझरुन परिसरातील जलसाठे प्रदूषित झाले आहेत. वाळूज महानगर परिसरातील विहिरी, हातपंप, बोअरवेल आदींचे पाणीही दूषित झाले आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे याचा पुरवठा ग्रामपंचायतींना थांबविला आहे. रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वडगाव, पंढरपूर, वाळूज, वळदगाव आदी ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसीकडे पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर दशकभरापासून यातील काही ग्रामपंचायतीना एमआयडीसीने पाणी पुरवठा सुरु केला आहे.

सध्या जायकवाडी जलाशयात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने महिनाभरापूर्वी उद्योग व निवासी क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका वाळूज, पंढरपूर, वडगाव, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतींना बसला आहे. पूर्वी या ग्रामपंचायतीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता फक्त १२ तास पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने अघोषित ५० टक्के पाणी कपात केल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद