शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:58 PM

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

गावातील मातोश्रीनगर, पवननगर या भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नळाला विद्युत पंप लावून पाणी भरले जात असल्यामुळे अनेक वसाहतींतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जवळपास दीड हजार मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, मोटारी जप्त होऊनही गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज मंगळवारी मातोश्रीनगर-पवननगर या भागातील संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. पाणीपट्टी भरूनही नियमितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप करीत महिला व नागरिकांनी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, ग्रामविकास अधिकारी एस.एन. रोहकले यांना धारेवर धरले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याचे आंदोलनकर्त्या नागरिकांना सांगितले. सर्व वसाहतींत टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. या आंदोलनात मिलिंद सिरसाठ, अली सय्यद, सुशीला जाधव, आरती जाधव, उज्ज्वला जाधव, वंदना गोरे, स्वाती जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता. 

टॅग्स :Walujवाळूज