शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

मराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:45 IST

नांदेडमध्ये स्थिती तुलनेने चांगली, विष्णुपुरीसह ४ प्रकल्प भरले

औरंगाबाद : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सलग दोन दिवस मराठवाड्यात भीज पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी, लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील साठा जेमतेमच असल्याचे पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. तुलनेने अपवाद केवळ नांदेड जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात ४० टक्के साठा झाला असून विष्णूपुरीसह ४ मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.दोन दिवसांच्या पावसानंतर जायकवाडीत अडीच टक्के पाणी वाढले आहे. धरणात २९.५५ टक्के साठा झाला आहे. लातूर जिल्ह्यात आठ पैकी तीन मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा जोत्याखाली आहे़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़८० टक्के साठा आहे़ बीड जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १६ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एका प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. १२६ लघुप्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ पैकी २० प्रकल्प कोरडेठाक असून, तब्बल ११७ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या येलदरी प्रकल्पात केवळ २ टक्केच पाणी आहे. नांदेड जिल्ह्याची स्थिती तुलनेनेचांगली आहे.जिल्ह्यात एकूण ३०० दलघमी म्हणजे ४० टक्के जलसाठा झाला आहे. नांदेडमधील विष्णूपूरीसह किनवट तालुक्यातील लोणी, डोंगरगाव व नागझरी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणात ४२ टक्के जलसाठा झाला असून २६ लघुप्रकल्पांपैकी १० तुडुंब भरले आहेत. जालना जिल्ह्यात सहा मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प असून दोन दिवसांच्या पावसाने त्यात जेमतेम वाढ झाली आहे.नागपूर विभागात अल्प जलसाठानागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा ४६.८९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे रिकामी आहेत. इतरही धरणात अल्प जलसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५० टक्के भरले आहे. अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.२४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे.अहमदनगरमध्ये सरासरी ५५ टक्के पाऊसगुरूवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सरासरीत एकदम १० टक्के भर पडून ती ५५ टक्के झाली आहे. बारा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पावसाने खरीप बाजरी, भूईमूग, कांदा, तूर, मूग, मका, कपाशी पिकांना जीवदान मिळणार आहे.खान्देशात कडधान्याचे उत्पादन घटणारखान्देशात दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा झाला असला तरी कडधान्याला २० ते ३० टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. जल प्रकल्पात थोडी वाढ झाली आहे. पावसाने जळगाव जिल्ह्याची सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली.धुळे जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी करपली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा कपाशी व तूर पिकाला जास्त फायदा होईल. साक्री तालुक्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले. ‘अक्कलपाडा’सह अनेर, बुराईच्या साठ्यात वाढ होत आहे.नंदुरबार जिल्ह्यात पाणीसाठा वाढला आहे. पिकांनाही जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरण