शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:45 IST

नांदेडमध्ये स्थिती तुलनेने चांगली, विष्णुपुरीसह ४ प्रकल्प भरले

औरंगाबाद : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सलग दोन दिवस मराठवाड्यात भीज पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी, लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील साठा जेमतेमच असल्याचे पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. तुलनेने अपवाद केवळ नांदेड जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात ४० टक्के साठा झाला असून विष्णूपुरीसह ४ मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.दोन दिवसांच्या पावसानंतर जायकवाडीत अडीच टक्के पाणी वाढले आहे. धरणात २९.५५ टक्के साठा झाला आहे. लातूर जिल्ह्यात आठ पैकी तीन मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा जोत्याखाली आहे़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़८० टक्के साठा आहे़ बीड जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १६ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एका प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. १२६ लघुप्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ पैकी २० प्रकल्प कोरडेठाक असून, तब्बल ११७ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या येलदरी प्रकल्पात केवळ २ टक्केच पाणी आहे. नांदेड जिल्ह्याची स्थिती तुलनेनेचांगली आहे.जिल्ह्यात एकूण ३०० दलघमी म्हणजे ४० टक्के जलसाठा झाला आहे. नांदेडमधील विष्णूपूरीसह किनवट तालुक्यातील लोणी, डोंगरगाव व नागझरी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणात ४२ टक्के जलसाठा झाला असून २६ लघुप्रकल्पांपैकी १० तुडुंब भरले आहेत. जालना जिल्ह्यात सहा मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प असून दोन दिवसांच्या पावसाने त्यात जेमतेम वाढ झाली आहे.नागपूर विभागात अल्प जलसाठानागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा ४६.८९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे रिकामी आहेत. इतरही धरणात अल्प जलसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५० टक्के भरले आहे. अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.२४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे.अहमदनगरमध्ये सरासरी ५५ टक्के पाऊसगुरूवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सरासरीत एकदम १० टक्के भर पडून ती ५५ टक्के झाली आहे. बारा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पावसाने खरीप बाजरी, भूईमूग, कांदा, तूर, मूग, मका, कपाशी पिकांना जीवदान मिळणार आहे.खान्देशात कडधान्याचे उत्पादन घटणारखान्देशात दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा झाला असला तरी कडधान्याला २० ते ३० टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. जल प्रकल्पात थोडी वाढ झाली आहे. पावसाने जळगाव जिल्ह्याची सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली.धुळे जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी करपली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा कपाशी व तूर पिकाला जास्त फायदा होईल. साक्री तालुक्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले. ‘अक्कलपाडा’सह अनेर, बुराईच्या साठ्यात वाढ होत आहे.नंदुरबार जिल्ह्यात पाणीसाठा वाढला आहे. पिकांनाही जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरण