शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची विहीर कोरडीठाक

By admin | Updated: August 5, 2014 23:57 IST

बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़

बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़ आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणाऱ़़ अशी परिस्थिती मांजरा नदीची झाली आहे़ परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून पाणीटंचाईवर पर्याय शोधणे अवघड बनले आहे़तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून बिलोली शहरासह जवळपासच्या २५ ते ३० खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो़ शहरांसह खेड्यापाड्यातील पाणीपुरवठ्याच्या योजना मांजराच्या पात्रात आहेत़ पात्रातील जलसाठा सातत्याने असणाऱ्या भागात भूमिगत विहिरी खोदून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी अशा भूमिगत विहिरी कोरड्या पडतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे़ अशा परिस्थितीत टँकर अथवा विहिरी अधिग्रहण करून पाणीटंचाईवर तोडगा काढला जातो़ पण उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर पर्याय करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना केल्या जातात़पावसाळ्यातील जलसाठा वाढल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होते असा २५ वर्षांतील अनुभव आहे़ पण यावर्षी आॅगस्ट उजाडला तरी मोठ्या पावसाचा पत्ता नाही़ अधूनमधून पाऊस पडतो, पण रिमझिम किंवा जमिनी भिजण्यापुरताच़ पण मागच्या दोन महिन्यात पावसाळ्याची सरासरी शंभर मि़मी़देखील गाठलेली नाही़ रस्त्यावर, नदी, नाले आदीमधून वाहून जाणारा पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे मांजरा नदीमध्येदेखील वाहते पाणी अजूनही दिसत नाही़मांजरात जलसाठा झाला नसल्याने भूमिगत विहिरीतील पाणीपातळी देखील वाढली नाही़ परिणामी आॅगस्टमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्यात अशी परिस्थिती प्रथम निर्माण झाल्याचे जाणकार सांगत आहेत़ पावसाळ्याने पाठ फिरवल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)वाळू उपशामुळे पर्यावरणावर परिणाम याचवर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच खाजगी वाळूपट्टयातून वाळूउपसा केला जात आहे़ सततच्या वाळूउपशामुळे पर्यावरणावर परिणाम होवून पाणीपातळी घटली आहे़ मागच्या ५० वर्षांत पावसाळ्यात कधीच वाळूउपसा झाला नाही़ पण यावर्षी पावसाळ्याने आॅगस्टमध्येही पाठ फिरवल्याने वाळू ठेकेदारांना चांगलीच संधी मिळाली़ शासकीय घाट बंद असले तरी खाजगी वाळूघाटातून सततच्या वाळूउपशामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ बेसुमार उपशामुळे मांजराचे वाळवंट बनले असून जलसाठा रोडावला आहे़ पाणी नसल्याचा परिणाम वाळूउपसा हे देखील कारण होय़