शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

पाणीपुरवठ्याची विहीर कोरडीठाक

By admin | Updated: August 5, 2014 23:57 IST

बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़

बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़ आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणाऱ़़ अशी परिस्थिती मांजरा नदीची झाली आहे़ परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून पाणीटंचाईवर पर्याय शोधणे अवघड बनले आहे़तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून बिलोली शहरासह जवळपासच्या २५ ते ३० खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो़ शहरांसह खेड्यापाड्यातील पाणीपुरवठ्याच्या योजना मांजराच्या पात्रात आहेत़ पात्रातील जलसाठा सातत्याने असणाऱ्या भागात भूमिगत विहिरी खोदून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी अशा भूमिगत विहिरी कोरड्या पडतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे़ अशा परिस्थितीत टँकर अथवा विहिरी अधिग्रहण करून पाणीटंचाईवर तोडगा काढला जातो़ पण उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर पर्याय करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना केल्या जातात़पावसाळ्यातील जलसाठा वाढल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होते असा २५ वर्षांतील अनुभव आहे़ पण यावर्षी आॅगस्ट उजाडला तरी मोठ्या पावसाचा पत्ता नाही़ अधूनमधून पाऊस पडतो, पण रिमझिम किंवा जमिनी भिजण्यापुरताच़ पण मागच्या दोन महिन्यात पावसाळ्याची सरासरी शंभर मि़मी़देखील गाठलेली नाही़ रस्त्यावर, नदी, नाले आदीमधून वाहून जाणारा पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे मांजरा नदीमध्येदेखील वाहते पाणी अजूनही दिसत नाही़मांजरात जलसाठा झाला नसल्याने भूमिगत विहिरीतील पाणीपातळी देखील वाढली नाही़ परिणामी आॅगस्टमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्यात अशी परिस्थिती प्रथम निर्माण झाल्याचे जाणकार सांगत आहेत़ पावसाळ्याने पाठ फिरवल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)वाळू उपशामुळे पर्यावरणावर परिणाम याचवर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच खाजगी वाळूपट्टयातून वाळूउपसा केला जात आहे़ सततच्या वाळूउपशामुळे पर्यावरणावर परिणाम होवून पाणीपातळी घटली आहे़ मागच्या ५० वर्षांत पावसाळ्यात कधीच वाळूउपसा झाला नाही़ पण यावर्षी पावसाळ्याने आॅगस्टमध्येही पाठ फिरवल्याने वाळू ठेकेदारांना चांगलीच संधी मिळाली़ शासकीय घाट बंद असले तरी खाजगी वाळूघाटातून सततच्या वाळूउपशामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ बेसुमार उपशामुळे मांजराचे वाळवंट बनले असून जलसाठा रोडावला आहे़ पाणी नसल्याचा परिणाम वाळूउपसा हे देखील कारण होय़