शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ

By शिरीष शिंदे | Updated: December 20, 2023 19:04 IST

धरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे.

बीड : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत मागील जवळपास ४ महिन्यांच्या कालावधीत लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून ४४ प्रकल्पांतून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. परिणामी, पुढील पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर जेवढा गाळ काढला आहे तेवढाच पाणीसाठा या प्रकल्पात होणार असल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात आली. यासाठी लोकसहभाग व अवनीच्या माध्यमातून हा गाळ काढण्यात आला आहे. यासोबतच नदी खोलीकरण व रुंदीकरणातूनसुद्धा गाळ काढण्यात आला आहे. सदरील योजनेमध्ये जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन शेतामध्ये तलावातील गाळ स्वतःच्या जमिनीमध्ये पसरलेला आहे. योजनेमध्ये लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थेमार्फत गाळ काढण्यात आला असून जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. सदरील योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे सुरू असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलावातून गाळ उपसा करण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवसंजीवनी देणारी ठरत आहे.

कृषी उत्पादनात होणार भरीव वाढगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणातील गाळ घेऊन जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्यामुळे एकूण ४५ प्रकल्पांतील लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणातून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढून ४२० हेक्टर शेतजमिनीवर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जमिनीची सुपीकता वाढीबरोबर एकूण ४५ प्रकल्पांमध्ये ४२.०८ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होऊन तलावाची मूळ सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. पुनर्स्थापित सिंचन क्षमतेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच कृषी उत्पादनातही भरीव वाढ होणार आहे.

लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरणातून काढलेला गाळतालुका-प्रकल्प संख्या-काढलेला गाळकेज-७-५८४८२-९७माजलगाव-३-१२६३८६.६-१७४आष्टी-१९-२५०७६०.५१-२२८पाटोदा-७-८७००१.४-१५३शिरूर-२-५२१६४-३१बीड-२-१३६२५२-२३वडवणी-१-६२२-३धारूर-२-२९७७२-३१परळी-१-६७६०६.९८-१८गेवराई-०-४२५५३५-०एकूण-४४-१२३४५८२२.८८-७५८

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादाधरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे. गाळाच्या ३५.७५ रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत एकरी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान फक्त अडीच एकरपर्यंत म्हणजेच ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत देय राहील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्रDamधरण