शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ

By शिरीष शिंदे | Updated: December 20, 2023 19:04 IST

धरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे.

बीड : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत मागील जवळपास ४ महिन्यांच्या कालावधीत लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून ४४ प्रकल्पांतून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. परिणामी, पुढील पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर जेवढा गाळ काढला आहे तेवढाच पाणीसाठा या प्रकल्पात होणार असल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात आली. यासाठी लोकसहभाग व अवनीच्या माध्यमातून हा गाळ काढण्यात आला आहे. यासोबतच नदी खोलीकरण व रुंदीकरणातूनसुद्धा गाळ काढण्यात आला आहे. सदरील योजनेमध्ये जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन शेतामध्ये तलावातील गाळ स्वतःच्या जमिनीमध्ये पसरलेला आहे. योजनेमध्ये लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थेमार्फत गाळ काढण्यात आला असून जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. सदरील योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे सुरू असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलावातून गाळ उपसा करण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवसंजीवनी देणारी ठरत आहे.

कृषी उत्पादनात होणार भरीव वाढगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणातील गाळ घेऊन जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्यामुळे एकूण ४५ प्रकल्पांतील लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणातून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढून ४२० हेक्टर शेतजमिनीवर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जमिनीची सुपीकता वाढीबरोबर एकूण ४५ प्रकल्पांमध्ये ४२.०८ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होऊन तलावाची मूळ सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. पुनर्स्थापित सिंचन क्षमतेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच कृषी उत्पादनातही भरीव वाढ होणार आहे.

लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरणातून काढलेला गाळतालुका-प्रकल्प संख्या-काढलेला गाळकेज-७-५८४८२-९७माजलगाव-३-१२६३८६.६-१७४आष्टी-१९-२५०७६०.५१-२२८पाटोदा-७-८७००१.४-१५३शिरूर-२-५२१६४-३१बीड-२-१३६२५२-२३वडवणी-१-६२२-३धारूर-२-२९७७२-३१परळी-१-६७६०६.९८-१८गेवराई-०-४२५५३५-०एकूण-४४-१२३४५८२२.८८-७५८

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादाधरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे. गाळाच्या ३५.७५ रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत एकरी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान फक्त अडीच एकरपर्यंत म्हणजेच ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत देय राहील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्रDamधरण