शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

चारशे दलघमीने वाढला जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 01:12 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ६९ % जलसाठा झाला.मराठवाड्यातील ८५० प्रकल्पांमध्ये मागील २६ सप्टेंबर रोजी एकूण ५०१६ दलघमी इतका उपयुक्त साठा होता. या सर्व धरणांमधील उपयुक्त साठा आता ५४४८ दलघमीवर पोहोचला आहे. आठवडाभरात सर्वाधिक २१५ दलघमी वाढ ही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये झाली आहे. मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प असून, त्यामध्ये सध्या ६९ टक्के म्हणजे १३२३ दलघमी इतका उपयुक्त साठा आहे.अकरा मोठ्या प्रकल्पांमध्येही या काळात ९९ दलघमीची भर पडली आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ३१३६ दलघमी म्हणजे ६० टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्त साठाही ८२ दलघमीने वाढून तो आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ७५९ दलघमी इतका साठा आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधारेही पावसाने तुडुंब भरले आहेत. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये सध्या १७७ दलघमी (७७ टक्के) इतका उपयुक्त साठा झाला आहे.