शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

आठशे दलघमीने वाढला जलसाठा

By admin | Updated: September 28, 2016 00:44 IST

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे आठवडाभरात मराठवाड्यातील मोठ्या धरणांमधील जलसाठा तब्बल आठशे दलघमीने वाढला आहे.

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे आठवडाभरात मराठवाड्यातील मोठ्या धरणांमधील जलसाठा तब्बल आठशे दलघमीने वाढला आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ६० टक्के (३०३७ दलघमी) उपयुक्त साठा झाला आहे. या काळात माजलगाव धरणात सर्वाधिक ३१२ दलघमी पाणी आले आहे.आठवडाभरापूर्वी जायकवाडी वगळता मराठवाड्यात इतर दहा मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यातही माजलगाव आणि मांजरा या दोन धरणांमध्ये शून्य टक्के साठा होता. मात्र सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे विभागातील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. माजलगाव धरणात तब्बल ३१२ दलघमी पाणी आले आहे. सध्या माजलगाव धरण शंभर टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे मांजरा धरणातही १७१ दलघमी पाणी आले आहे. त्यामुळे हे धरण पूर्णपणे भरले आहे. या दोन्ही धरणांच्या सांडव्यातून सध्या विसर्ग करण्यात येत आहे. यापाठोपाठ निम्न मनार धरणातही १०० दलघमी, तेरणा धरणात ४२ दलघमी, सिना कोळेगाव धरणात ४६ दलघमी पाणी आले आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पात १०५ दलघमी, येलदरी प्रकल्पात २३ दलघमी आणि सिद्धेश्वर प्रकल्पातही ७ दलघमी पाणी वाढले आहे. मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांच्या उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ५१४३ दलघमी इतकी आहे. आता या धरणांमध्ये ३०३७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यातही भरीव वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७२ टक्के जलसाठा झाला आहे, तर ७३२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ६९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय गोदावरी नदीवरील ११ बंधारेही ६२ टक्के भरले आहेत. तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २१ बंधाऱ्यांमध्येही ७५ टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.