शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

आठशे दलघमीने वाढला जलसाठा

By admin | Updated: September 28, 2016 00:44 IST

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे आठवडाभरात मराठवाड्यातील मोठ्या धरणांमधील जलसाठा तब्बल आठशे दलघमीने वाढला आहे.

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे आठवडाभरात मराठवाड्यातील मोठ्या धरणांमधील जलसाठा तब्बल आठशे दलघमीने वाढला आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ६० टक्के (३०३७ दलघमी) उपयुक्त साठा झाला आहे. या काळात माजलगाव धरणात सर्वाधिक ३१२ दलघमी पाणी आले आहे.आठवडाभरापूर्वी जायकवाडी वगळता मराठवाड्यात इतर दहा मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यातही माजलगाव आणि मांजरा या दोन धरणांमध्ये शून्य टक्के साठा होता. मात्र सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे विभागातील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. माजलगाव धरणात तब्बल ३१२ दलघमी पाणी आले आहे. सध्या माजलगाव धरण शंभर टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे मांजरा धरणातही १७१ दलघमी पाणी आले आहे. त्यामुळे हे धरण पूर्णपणे भरले आहे. या दोन्ही धरणांच्या सांडव्यातून सध्या विसर्ग करण्यात येत आहे. यापाठोपाठ निम्न मनार धरणातही १०० दलघमी, तेरणा धरणात ४२ दलघमी, सिना कोळेगाव धरणात ४६ दलघमी पाणी आले आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पात १०५ दलघमी, येलदरी प्रकल्पात २३ दलघमी आणि सिद्धेश्वर प्रकल्पातही ७ दलघमी पाणी वाढले आहे. मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांच्या उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ५१४३ दलघमी इतकी आहे. आता या धरणांमध्ये ३०३७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यातही भरीव वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७२ टक्के जलसाठा झाला आहे, तर ७३२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ६९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय गोदावरी नदीवरील ११ बंधारेही ६२ टक्के भरले आहेत. तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २१ बंधाऱ्यांमध्येही ७५ टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.