शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

चिंचोली लिंबाजी परिसरात हिवाळ्यातच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:12 AM

जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने ६ दिवसांआड, तर कुठे ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी थंडीत कुडकुडत ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.दरवर्षी कमी पर्जन्यमान, त्यातच भूगर्भातील सतत खालावणारी पाणीपातळी यामुळे गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी या भागातील विहिरी ऐन हिवाळ्यातच तळ गाठत आहेत. यंदाही वरुणराजाची अवकृपा झाल्याने येथील नदी, नाले, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे कोरडेच राहिले. येथील पाणी प्रश्न गणेशपूर लघु प्रकल्पावर अवलंबून असतो.मात्र, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्ण पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पाणीपातळीत एक इंचही वाढ झाली नाही.सध्या प्रकल्प कोरडा पडला आहे. यामुळे या प्रकल्पाखालील शेलगाव, दिगाव आदी गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.गत सात-आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. शेलगावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचयात सदस्य विठ्ठल मनगटे म्हणाले की, सध्याची विहिरींची पाणीपरिस्थिती पाहता फेब्रुवारीमध्ये गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई दूर करावी.शेलगाव, दिगाव दोन्ही गावांना विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक पी.आर. दहीहंडे यांनी दिली.