शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:33 IST

पाणीटंचाई असलेल्या २९ गावांमध्ये ३१ टँकरच्या ५४ खेपाद्वारे पाणीपुरवठा होत आहे

- संजय जाधवपैठण: सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा सप्टेंबर महिण्या पासूनच पैठण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या २९ गावात ३१ टँकरने ५४ खेपा करून ५८०७६ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.आणखी दहा गावांनी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून टँकरने पाणी मागणाऱ्या गावाच्या संख्येत यापुढे वाढ होणार आहे. 

जानेवारी महिन्यानंतर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. यंदा तालुक्यात जेमतेम सरासरी ३३८ मि मी पाऊस झाला. जोरदार पाऊस न झाल्याने नद्या नाल्यांना सुध्दा यंदा पाणी वाहिले नाही. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावली असून अनेक गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी कमी पडत आहे.यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

३१ टँकरने ५४ खेपातालुक्यातील पुढील गावात टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. कंसात खेपाची संख्या. आडूळ - (१ खेप) आडूळ बु (३ खेपा), आंतरवाली खांडी (१), ब्राम्हणगाव तांडा (१), गेवराई मर्दा (१), गेवराई बु (१), गेवराई खु (१), अब्दुल्लापूर व होणबाची वाडी (१), एकतुणी (२), रजापूर (१), थापटी तांडा (१), आडगाव जावळे (१), कडेठाण (१), ब्राम्हणगाव (१), दाभरूळ (१), दरेगाव (१), देवगाव व देवगाव तांडा (१), डोणगाव (१), टेकडी तांडा (१), खादगाव (१), तुपेवाडी (१), तुपेवाडी तांडा (१), चिंचाळा (१), मीरखेडा (१), केकतजळगाव (२),  हार्षी (१) व चौंढाळा (१) या प्रमाणे पाणी पुरवठा सुरू असल्याचे विभाग प्रमुख राजेश कांबळे यांनी सांगितले.

खोडेगाव व मुधलवाडी येथे केंद्रऔद्योगिक वसाहतीतील खोडेगाव व मुधलवाडी येथील पाईपलाईनवर टँकर भरण्यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तीन खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत असे प्रभारी गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.

तालुक्यातील जलसाठे निरंकपैठण तालुक्यातील जायकवाडी धरण वगळता इतर सर्व जलसाठे निरंक आहेत. यामुळे पैठण तालुक्यात आगामी काळात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. पैठण तालुक्यातील कचनेर, देवगाव, निलजगाव, दावरवाडी, ईनायतपूर, वरवंडी , गेवराई या पाझर तलावातील जलसाठा निरंक आहे.मध्यम व लघु प्रकल्प: खेर्डा- निरंक, शिवणी - १५%. गोदावरी वरील मोठे बंधारे:  आपेगाव - २०%, हिरडपुरी - १५% 

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवूनतालुक्यातील जलस्त्रोताची परिस्थिती लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनास दिले आहेत.गावनिहाय परिस्थितीची नोंद आराखड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे- सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी, पैठण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी