शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:33 IST

पाणीटंचाई असलेल्या २९ गावांमध्ये ३१ टँकरच्या ५४ खेपाद्वारे पाणीपुरवठा होत आहे

- संजय जाधवपैठण: सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा सप्टेंबर महिण्या पासूनच पैठण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या २९ गावात ३१ टँकरने ५४ खेपा करून ५८०७६ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.आणखी दहा गावांनी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून टँकरने पाणी मागणाऱ्या गावाच्या संख्येत यापुढे वाढ होणार आहे. 

जानेवारी महिन्यानंतर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. यंदा तालुक्यात जेमतेम सरासरी ३३८ मि मी पाऊस झाला. जोरदार पाऊस न झाल्याने नद्या नाल्यांना सुध्दा यंदा पाणी वाहिले नाही. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावली असून अनेक गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी कमी पडत आहे.यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

३१ टँकरने ५४ खेपातालुक्यातील पुढील गावात टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. कंसात खेपाची संख्या. आडूळ - (१ खेप) आडूळ बु (३ खेपा), आंतरवाली खांडी (१), ब्राम्हणगाव तांडा (१), गेवराई मर्दा (१), गेवराई बु (१), गेवराई खु (१), अब्दुल्लापूर व होणबाची वाडी (१), एकतुणी (२), रजापूर (१), थापटी तांडा (१), आडगाव जावळे (१), कडेठाण (१), ब्राम्हणगाव (१), दाभरूळ (१), दरेगाव (१), देवगाव व देवगाव तांडा (१), डोणगाव (१), टेकडी तांडा (१), खादगाव (१), तुपेवाडी (१), तुपेवाडी तांडा (१), चिंचाळा (१), मीरखेडा (१), केकतजळगाव (२),  हार्षी (१) व चौंढाळा (१) या प्रमाणे पाणी पुरवठा सुरू असल्याचे विभाग प्रमुख राजेश कांबळे यांनी सांगितले.

खोडेगाव व मुधलवाडी येथे केंद्रऔद्योगिक वसाहतीतील खोडेगाव व मुधलवाडी येथील पाईपलाईनवर टँकर भरण्यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तीन खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत असे प्रभारी गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.

तालुक्यातील जलसाठे निरंकपैठण तालुक्यातील जायकवाडी धरण वगळता इतर सर्व जलसाठे निरंक आहेत. यामुळे पैठण तालुक्यात आगामी काळात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. पैठण तालुक्यातील कचनेर, देवगाव, निलजगाव, दावरवाडी, ईनायतपूर, वरवंडी , गेवराई या पाझर तलावातील जलसाठा निरंक आहे.मध्यम व लघु प्रकल्प: खेर्डा- निरंक, शिवणी - १५%. गोदावरी वरील मोठे बंधारे:  आपेगाव - २०%, हिरडपुरी - १५% 

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवूनतालुक्यातील जलस्त्रोताची परिस्थिती लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनास दिले आहेत.गावनिहाय परिस्थितीची नोंद आराखड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे- सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी, पैठण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी