शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंब; जायकवाडी धरणातील आपत्कालीन पंप सुरू करणार

By मुजीब देवणीकर | Updated: April 18, 2024 12:43 IST

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने निर्णय

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू झाली आहे. धरणातील पाणीपातळीसुद्धा झपाट्याने घटत चालली असून, मनपाला पाण्याचा उपसा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत आहे. धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप पुढील पंधरा दिवसांत सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

धरणात सध्या १४.५ टक्के इतका पाणीसाठा आहे. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे महापालिकेचा पाणी उपसा ५ एमएलडीने घटला. पुढील पंधरा दिवसांत पाणीपातळी आणखी कमी होईल. त्यामुळे धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे.

रामनवमीचा मुहूर्त साधून मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी त्यांच्या नूतनीकरण केलेल्या आणि कार्पोरेट लूक दिलेल्या मनपा मुख्यालयातील दालनाचे फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. पाण्याची मागणी वाढली असली तरी जायकवाडीतून उपसा वाढलेला नाही. नवीन ९०० मिमीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यातून शहराला १८ एमएलडी पाणी मिळत आहे. पाणीपातळी घटल्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा उपसा ५ एमएलडीने घटला. शहरात १३० ते १३५ एमएलडी पाणी येत आहे. हर्सूल तलावातून ८ एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातच टँकर भरण्यासाठी ३ एमएलडी पाणी द्यावे लागत असल्याचे प्रशासक यांनी सांगितले.

आपत्कालीन पंपगृह वापरणारधरणातून पाणी उपसा करताना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक अडचणी येत आहेत. धरणात आपत्कालीन पंपगृह बांधलेले आहे. हे पंपगृह उघडे पडल्यामुळे त्यामध्ये पंप बसवून शहराला पाणी पुरवठा करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. १५ दिवसांनी आपत्कालीन पंपाद्वारे पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे श्रीकांत म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी