शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबादकरांवर जलसंकट; आता मिळणार सात दिवसांआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:30 IST

एक्स्प्रेस जलवाहिनीकडे मनपा आयुक्त फिरकलेच नाहीत

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक सध्या पाणी प्रश्नाला जाम कंटाळले आहेत. पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून महापालिकेने दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला. आता तर पालिकेने हद्दच केली आहे. अघोषित नियमानुसार चक्क सात दिवसांआड शहरातील विविध वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. एवढ्यावरही महापालिका प्रशासन पाणी प्रश्न गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही. शहरात येणाऱ्या पाण्यात कशी वाढ होईल, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सिडको-हडकोतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. त्यांनी जलवाहिनीकडे दिवसभरात ढुंकूनही पाहिले नाही.

मागील एक महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एन-५, एन-७ पाण्याच्या टाकीवर दररोज नागरिक आंदोलन करीत आहेत. मनपा मुख्यालयासमोरही विविध वसाहतींमधील नागरिक येऊन आंदोलन करीत आहेत. मनपा प्रशासन कोणत्याच उपाययोजना करण्यास तयार नाही. पूर्वी शहरात दोन दिवसांआड पाणी देण्यात येत होते. पाणी कमी पडू लागले म्हणून मनपाने तीन दिवसांआडचा निर्णय घेतला. यालाही नागरिकांनी मूक संमती दिली. आता महापालिका प्रशासनाने कहरच केला. अघोषितपणे शहरातील बहुतांश वसाहतींना सहा, सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. अनेक नागरिकांकडे आठ दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच नाही.

वीज वितरण कंपनीचे शटडाऊनसिडको-हडको भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाच शुक्रवारी वीज वितरण कंपनीने तब्बल अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे तब्बल सातव्या दिवशीदेखील पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री उशिरा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. सिडको एन-५ भागातील आविष्कार कॉलनीसह इतर ठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठ्याचा वेळ होता. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. मात्र एकाने महापालिकेच्या पाईपलाईनवरच बोअर घेतल्याचा प्रकार समोर आला. या बोअरमुळे पाणी पुढच्या भागाला पोहोचलेच नाही. दरम्यान पाणीपुरवठा बंद करून पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी पाणी येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी ११ ते १.३० असा अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे या भागाला पाणी मिळू शकले नाही. रात्री उशिरा पाणी दिले जाईल, असे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.  

सिडको-हडकोकडे दुर्लक्षशहरातील ४० पेक्षा अधिक वॉर्डांना एन-५, एन-७ येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. येथे पाणीच कमी येत आहे. त्यामुळे शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांच्या सूचनेवरून नक्षत्रवाडी ते एन-५ पाण्याच्या टाकीपर्यंत एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. दुपारी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आयुक्त आले आणि तिसऱ्या मिनिटाला निघूनही गेले.

कोणत्या भागात पाणी कधी

जयभवानीनगर - सहा दिवसांनंतरशिवाजीनगर- चार दिवसांनंतरब्रिजवाडी- सात दिवसांनंतरनारेगाव- सात दिवसांनंतरपॉवरलूम- सात दिवसांनंतररवींद्रनगर- चार दिवसांनंतरमछली खडक- सात दिवसांनंतरएस. टी. कॉलनी, मुकुंदवाडी- पाच दिवसांनंतरबेगमपुरा- आठ दिवसांनंतरगजाननगर-पुंडलिकनगर- चार दिवसांनंतरआरेफ कॉलनी- सात दिवसांनंतरसाईनगर-एन-६- पाच दिवसांनंतरगजानन कॉलनी- चार दिवसांनंतररामनगर, मुकुंदवाडी- सात दिवसांनंतर 

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी