शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांवर जलसंकट; आता मिळणार सात दिवसांआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:30 IST

एक्स्प्रेस जलवाहिनीकडे मनपा आयुक्त फिरकलेच नाहीत

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक सध्या पाणी प्रश्नाला जाम कंटाळले आहेत. पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून महापालिकेने दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला. आता तर पालिकेने हद्दच केली आहे. अघोषित नियमानुसार चक्क सात दिवसांआड शहरातील विविध वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. एवढ्यावरही महापालिका प्रशासन पाणी प्रश्न गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही. शहरात येणाऱ्या पाण्यात कशी वाढ होईल, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सिडको-हडकोतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. त्यांनी जलवाहिनीकडे दिवसभरात ढुंकूनही पाहिले नाही.

मागील एक महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एन-५, एन-७ पाण्याच्या टाकीवर दररोज नागरिक आंदोलन करीत आहेत. मनपा मुख्यालयासमोरही विविध वसाहतींमधील नागरिक येऊन आंदोलन करीत आहेत. मनपा प्रशासन कोणत्याच उपाययोजना करण्यास तयार नाही. पूर्वी शहरात दोन दिवसांआड पाणी देण्यात येत होते. पाणी कमी पडू लागले म्हणून मनपाने तीन दिवसांआडचा निर्णय घेतला. यालाही नागरिकांनी मूक संमती दिली. आता महापालिका प्रशासनाने कहरच केला. अघोषितपणे शहरातील बहुतांश वसाहतींना सहा, सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. अनेक नागरिकांकडे आठ दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच नाही.

वीज वितरण कंपनीचे शटडाऊनसिडको-हडको भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाच शुक्रवारी वीज वितरण कंपनीने तब्बल अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे तब्बल सातव्या दिवशीदेखील पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री उशिरा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. सिडको एन-५ भागातील आविष्कार कॉलनीसह इतर ठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठ्याचा वेळ होता. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. मात्र एकाने महापालिकेच्या पाईपलाईनवरच बोअर घेतल्याचा प्रकार समोर आला. या बोअरमुळे पाणी पुढच्या भागाला पोहोचलेच नाही. दरम्यान पाणीपुरवठा बंद करून पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी पाणी येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी ११ ते १.३० असा अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे या भागाला पाणी मिळू शकले नाही. रात्री उशिरा पाणी दिले जाईल, असे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.  

सिडको-हडकोकडे दुर्लक्षशहरातील ४० पेक्षा अधिक वॉर्डांना एन-५, एन-७ येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. येथे पाणीच कमी येत आहे. त्यामुळे शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांच्या सूचनेवरून नक्षत्रवाडी ते एन-५ पाण्याच्या टाकीपर्यंत एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. दुपारी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आयुक्त आले आणि तिसऱ्या मिनिटाला निघूनही गेले.

कोणत्या भागात पाणी कधी

जयभवानीनगर - सहा दिवसांनंतरशिवाजीनगर- चार दिवसांनंतरब्रिजवाडी- सात दिवसांनंतरनारेगाव- सात दिवसांनंतरपॉवरलूम- सात दिवसांनंतररवींद्रनगर- चार दिवसांनंतरमछली खडक- सात दिवसांनंतरएस. टी. कॉलनी, मुकुंदवाडी- पाच दिवसांनंतरबेगमपुरा- आठ दिवसांनंतरगजाननगर-पुंडलिकनगर- चार दिवसांनंतरआरेफ कॉलनी- सात दिवसांनंतरसाईनगर-एन-६- पाच दिवसांनंतरगजानन कॉलनी- चार दिवसांनंतररामनगर, मुकुंदवाडी- सात दिवसांनंतर 

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी