शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जायकवाडीतून उपसा घटल्याने शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:22 IST

तीन दिवसांपासून दररोज १० एमएलडीने पाणी कमी 

ठळक मुद्देउन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते.मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये शहरात येणारे पाणी तब्बल १० एमएलडीने घटले आहे. शहरात फक्त ९० एमएलडी पाणी येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शहरातील लाखो नागरिकांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आज तातडीने धरणात महापालिकेची यंत्रसामुग्री पाठवून मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत येणारे पाणी आणखी वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले.

उन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून २४ तास डोळ्यात तेल ओतून पाण्याचा उपसा करावा लागत होता. महापालिकेने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन २०१३ मध्ये धरणात १० कोटी रुपये खर्च करून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या चॅनलद्वारे मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत येत होते. मृतसाठाही कमी कमी होत असल्याने मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत पाणीच येत नाही. शिवाय मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या बाजूला ४५० मीटरची विहीरही तयार केली आहे. या विहिरीतही पाणी कमी येत आहे. सहा फ्लोटिंग पंपांद्वारे २४ तास गाळातून पाण्याचा उपसा सुरू आहे. पंप दर दोन ते तीन तासाला बंद पडत आहेत. पंपांत गवत, शेवाळ मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मनपाला उपसा करण्यासाठी समाधानकारक पाणीच मिळत नाही. मनपाला १२० एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळायला तयार नाही.  

खोदकाम सुरूपाणीपुरवठ्याची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आज मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सिंचन विभागाची परवानगी मिळवून धरणात चर खोदण्याचे काम सुरू केले. किमान १०० ते १२५ एमएलडी पाणी येथून मिळेल, यादृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चार दिवसांआड पाणीपुंडलिकनगर, शिवाजीनगर, एसएफएस पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्यात येत होते.  मनपाने  या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला . या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळेल. एन-५, एन-७ येथील दोन जलकुंभावरील २२ वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सिडको-हडको आणि चिकलठाणा भागाला पाचव्या दिवशी पाणी मिळेल.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdroughtदुष्काळ