शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून उपसा घटल्याने शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:22 IST

तीन दिवसांपासून दररोज १० एमएलडीने पाणी कमी 

ठळक मुद्देउन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते.मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये शहरात येणारे पाणी तब्बल १० एमएलडीने घटले आहे. शहरात फक्त ९० एमएलडी पाणी येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शहरातील लाखो नागरिकांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आज तातडीने धरणात महापालिकेची यंत्रसामुग्री पाठवून मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत येणारे पाणी आणखी वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले.

उन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून २४ तास डोळ्यात तेल ओतून पाण्याचा उपसा करावा लागत होता. महापालिकेने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन २०१३ मध्ये धरणात १० कोटी रुपये खर्च करून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या चॅनलद्वारे मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत येत होते. मृतसाठाही कमी कमी होत असल्याने मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत पाणीच येत नाही. शिवाय मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या बाजूला ४५० मीटरची विहीरही तयार केली आहे. या विहिरीतही पाणी कमी येत आहे. सहा फ्लोटिंग पंपांद्वारे २४ तास गाळातून पाण्याचा उपसा सुरू आहे. पंप दर दोन ते तीन तासाला बंद पडत आहेत. पंपांत गवत, शेवाळ मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मनपाला उपसा करण्यासाठी समाधानकारक पाणीच मिळत नाही. मनपाला १२० एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळायला तयार नाही.  

खोदकाम सुरूपाणीपुरवठ्याची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आज मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सिंचन विभागाची परवानगी मिळवून धरणात चर खोदण्याचे काम सुरू केले. किमान १०० ते १२५ एमएलडी पाणी येथून मिळेल, यादृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चार दिवसांआड पाणीपुंडलिकनगर, शिवाजीनगर, एसएफएस पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्यात येत होते.  मनपाने  या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला . या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळेल. एन-५, एन-७ येथील दोन जलकुंभावरील २२ वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सिडको-हडको आणि चिकलठाणा भागाला पाचव्या दिवशी पाणी मिळेल.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdroughtदुष्काळ