शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून उपसा घटल्याने शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:22 IST

तीन दिवसांपासून दररोज १० एमएलडीने पाणी कमी 

ठळक मुद्देउन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते.मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये शहरात येणारे पाणी तब्बल १० एमएलडीने घटले आहे. शहरात फक्त ९० एमएलडी पाणी येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शहरातील लाखो नागरिकांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आज तातडीने धरणात महापालिकेची यंत्रसामुग्री पाठवून मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत येणारे पाणी आणखी वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले.

उन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून २४ तास डोळ्यात तेल ओतून पाण्याचा उपसा करावा लागत होता. महापालिकेने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन २०१३ मध्ये धरणात १० कोटी रुपये खर्च करून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या चॅनलद्वारे मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत येत होते. मृतसाठाही कमी कमी होत असल्याने मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत पाणीच येत नाही. शिवाय मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या बाजूला ४५० मीटरची विहीरही तयार केली आहे. या विहिरीतही पाणी कमी येत आहे. सहा फ्लोटिंग पंपांद्वारे २४ तास गाळातून पाण्याचा उपसा सुरू आहे. पंप दर दोन ते तीन तासाला बंद पडत आहेत. पंपांत गवत, शेवाळ मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मनपाला उपसा करण्यासाठी समाधानकारक पाणीच मिळत नाही. मनपाला १२० एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळायला तयार नाही.  

खोदकाम सुरूपाणीपुरवठ्याची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आज मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सिंचन विभागाची परवानगी मिळवून धरणात चर खोदण्याचे काम सुरू केले. किमान १०० ते १२५ एमएलडी पाणी येथून मिळेल, यादृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चार दिवसांआड पाणीपुंडलिकनगर, शिवाजीनगर, एसएफएस पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्यात येत होते.  मनपाने  या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला . या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळेल. एन-५, एन-७ येथील दोन जलकुंभावरील २२ वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सिडको-हडको आणि चिकलठाणा भागाला पाचव्या दिवशी पाणी मिळेल.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdroughtदुष्काळ