शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; यंत्रणाच बेलगाम, कोणाचाही वचक नाही, प्रत्येक टँकरमधील पाण्याची विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:46 IST

मनपाच्या पाण्यावर दररोज हजारो रुपये कमविण्याचा उद्याेग सुरू झाला आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : सिडको-हडकोसह जुन्या शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याची प्रचंड ओरड सुरू आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याच्याशी काहीच देणेघेणे नाही. उलट टँकरच्या माध्यमाने टाक्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी चोरण्यात येत आहे. चोरलेले पाणी कशापद्धतीने विकण्यात येते, हे पाहणे अत्यंत गमतीशीर आहे. मनपाच्या पाण्यावर दररोज हजारो रुपये कमविण्याचा उद्याेग सुरू झाला. विशेष बाब म्हणजे, मनपानेच नियुक्त केलेली टँकर लॉबी एवढी मोठी झाली की, ती मनपाच्या अधिकाऱ्यांचेही ऐकायला तयार नाही.

२०१२ पर्यंत महापालिकेच्या मालकीचे १२ लहान-मोठे टँकर होते. एखाद्या वसाहतीत पाणी आले नाही, तर तेथे मोफत स्वरूपात मनपाचे टँकर नागरिकांना दिले जात होते. नंतर समांतर जलवाहिनीचे काम करणारी युटिलिटी कंपनी आली. मनपाने सर्व टँकर कंपनीला मोफत देऊन टाकले. कंपनीने टँकरची वाट लावली. २०१८ मध्ये टँकर भंगारात विकले. आता मनपाकडे ४ टँकर आहेत. ते झाडांना पाणी टाकण्यासाठी आहेत. मागील १० वर्षांत मनपात टँकर लॉबी सक्रिय झाली. हळूहळू ही लॉबी अधिक बळकट होत गेली. सध्या खासगी कंत्राटदारामार्फत ८० टँकर चालतात. अनेक टँकरच्या फेऱ्याच गायब केल्या जातात. नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याचीही चोरी होते.

- दोन हजार लीटर टँकरला गुंठेवारीतील १५ ते १८ ड्रम असलेल्या नागरिकांच्या ग्रुपला पाणी द्यायचे असते. प्रत्येकी एक ड्रम म्हणजे १०० लीटर होय. १८ ड्रमचे १८०० लीटर पाणी दिले जाते. उर्वरित दोन ड्रमचे पाणी परिसरातच राजरोसपणे विकले जाते.- १२ हजार लीटरच्या टँकरला ६० ते ८० ड्रमच्या ग्रुपला पाणी द्यायचे असते. ८० ड्रमला ८ हजार लीटर पाणी दिल्यावर ४ हजार लीटर पाणी शिल्लक राहते. हे पाणी मागेल त्याला विकले जाते.-८० टँकर दिवसभरात किमान ६०० फेऱ्या पूर्ण करतात. एका टँकरमध्ये एका फेरीत २०० लीटर पाण्याची चोरी होत असेल, तर दिवसभरात किती लाख लीटर पाण्याची चोरी होते याचा अंदाज येतो.

अधिकारी, कर्मचारी मुजोरसोमवारी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हेमंत कोल्हे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील पाणीटंचाईवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या बैठकीकडेच पाठ फिरविली. त्यामुळे या विभागातील काही कर्मचाऱ्यांवर निलंबन अटळ असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी