शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:08 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

निळवंडे प्रकल्पातून १४ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. निळवंडे प्रकल्पातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यातून येते. या बंधाºयाच्या कालव्यांतून पाणी वळविण्यात आले. बंधारा भरल्यानंतर ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी प्रकल्पाकडे येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच दिवस उलटूनही जायकवाडी प्रकल्पात अजूनही पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

ओझर बंधाºयाखील जवळपास १६ बंधारे आहेत. पाणी अडविण्याचा प्रकार थांबल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पुढे केवळ पाचेगाव आणि मधमेश्वर बंधारे आहे. मधमेश्वरचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे दोन बंधारे ओलांडून रात्रीतून पाणी जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निळवंडेतून पाच दिवसांपासून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. जायकवाडीत रविवारी सकाळी २९.४८ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी पाणीसाठ्यात किती वाढ होते अथवा किती पाण्याची आवक होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाथसागरापर्यंत फारसे पाणी येण्याची चिन्हे नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद