शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:08 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

निळवंडे प्रकल्पातून १४ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. निळवंडे प्रकल्पातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यातून येते. या बंधाºयाच्या कालव्यांतून पाणी वळविण्यात आले. बंधारा भरल्यानंतर ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी प्रकल्पाकडे येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच दिवस उलटूनही जायकवाडी प्रकल्पात अजूनही पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

ओझर बंधाºयाखील जवळपास १६ बंधारे आहेत. पाणी अडविण्याचा प्रकार थांबल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पुढे केवळ पाचेगाव आणि मधमेश्वर बंधारे आहे. मधमेश्वरचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे दोन बंधारे ओलांडून रात्रीतून पाणी जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निळवंडेतून पाच दिवसांपासून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. जायकवाडीत रविवारी सकाळी २९.४८ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी पाणीसाठ्यात किती वाढ होते अथवा किती पाण्याची आवक होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाथसागरापर्यंत फारसे पाणी येण्याची चिन्हे नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद