शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी काठच्या ४३ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:53 IST

औरंगाबाद जिल्ह्यात जून व जुलै महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत ७४ मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे.

औरंगाबाद :जायकवाडी धरणात सध्या ९१.५७ टक्के पाणीसाठा असून नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापुरातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रशासनाने केले आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यातील ४३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणात २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. धरणात १९ हजार ८५ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. तर ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १० ते २७ क्रमांकाचे दरवाजे दीड फूट उघडले आहेत. २६ ते २७ जुलै सकाळपर्यंत जिल्ह्यात ७.७ मि.मी.पावसाची नोंद झाली. ८ ते २७ जुलै या २० दिवसांत तीन दिवस सूर्यदर्शन झाले. १७ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात शहर व जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे.

माणसे व जनावरे दगावलीयंदाच्या पावसाळ्यात आजवर ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात ६ जणांचा वीज पडून तर ३ जणांचा पुरात वाहून बळी गेला आहे. त्यांना ४ लाखप्रमाणे प्रती व्यक्ती शासकीय मदत देण्यात आली आहे, तर २२ लहान-मोठी जनावरे दगावली आहेत.

३२ ठिकाणी पडझडजिल्ह्यातील ३२ ठिकाणी पडझड झाली. यात कच्ची घरे मोठ्या प्रमाणात पडली. पावसामुळे भिंती पडणे, छत काेसळणे आदी घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. बहुतांश घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत.

सरासरीपेक्षा ७४ मि.मी. जास्तीचा पाऊसजिल्ह्यात जून व जुलै महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत ७४ मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे. २५७ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षित होेते, त्या तुलनेत ३३१ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. ७४ मि.मी. पाऊस अधिक झाला आहे. अजून पावसाळ्याचे ६४ दिवस जायचे आहेत. येणाऱ्या काळात जास्तीचा पाऊस झाला तर पिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. ५८१ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३३१ मि.मी म्हणजेच ५६ टक्के पाऊस आजवर झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस