शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शहरात नळांना मीटर बसवावेच लागतील : आस्तिक कुमार पाण्डेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:02 IST

१६८० कोटी रुपयांच्या योजनेमध्ये नळांना मीटर बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी योजनेतून केले जाणार नियोजन मीटरशिवाय नागरिकांना पाणीच मिळणार नाही.

औरंगाबाद : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी नियोजित नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. १६८० कोटी रुपयांच्या योजनेमध्ये नळांना मीटर बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटी योजनेतून नळांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मीटरशिवाय नागरिकांना पाणीच मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांना मीटर बसवावे लागतील, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

राज्य शासनाने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र, राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर योजनेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरूच ठेवली होती. पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देताना महापालिकेचे प्रशासक पाण्डेय म्हणाले की,  योजनेचे काम लवकरच मार्गी लागेल, सध्या ही फाईल शासनाच्या नगरविकास खात्याकडे आहे. त्यानंतर  वित्त विभागाची  मंजुरी घ्यावी लागेल. राज्य शासनाने महापालिकेच्या हिश्श्याचा निधी भरण्याची हमी घेतली आहे. या योजनेत नळांना मीटर बसविले जाणार आहेत. त्यासाठी स्मार्ट वॉटर योजनेंतर्गत स्मार्ट सिटीतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पाण्याचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी व कमी वापर करणाऱ्यांसाठी समानच दर आहेत. मीटर बसविल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या वापरानुसार पैसे भरावे लागतील. त्यात अनेकांचा सध्याच्या पाणीपट्टीपेक्षा कमी बिल येऊ शकते. त्यामुळे विरोध होण्याचे कारण नाही. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांनी नळांना मीटर बसविले आहेत. आपण किती दिवस टाळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुण्याच्या एजन्सीची नियुक्तीवॉटर मीटरसंदर्भात पुण्याच्या ब्लू स्ट्रीम या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे लोक प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात शहरात येणार आहेत.४ अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर प्रकल्पावर किती खर्च होईल, याचा अंदाज येईल, असे स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर केली आहे.

पाच रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण शहरातील पाच रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केंद्र शासनाने रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेला निधी दिला होता. त्यातून महावीर चौक ते आमखास मैदान रस्ता दुभाजक विकसित करण्यात आले. याच धर्तीवर पाच रस्ते दुभाजकांची कामे केली जाणार आहेत. शहरातील पाच ठिकाणच्या रस्ते दुभाजकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महावीर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौक, जामा मशीद ते अण्णाभाऊ साठे पुतळा (जिल्हाधिकारी कार्यालय), जिल्हाधिकारी कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते हडको टी पॉइंट तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते दिल्लीगेट रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद