शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशी पाणी; औरंगाबादचे अजून नियोजनच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:00 IST

शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले होते. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अजून पाणी देण्याच्या नियोजनातच मग्न आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश धाब्यावर : अधिकाऱ्यांकडून चालढकल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले होते. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अजून पाणी देण्याच्या नियोजनातच मग्न आहे.शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांना दुसºया आणि तिसºया दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. या वॉर्डांमधील ५० पेक्षा अधिक वसाहतींना २४ तास पाणी मिळते. कारण मुख्य जलवाहिनीवरून वॉर्डांमध्ये पाणी घेण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन, क्रॉस कनेक्शन तोडण्याचे धाडस आजपर्यंत मनपा प्रशासनाने दाखविलेले नाही. राजकीय दबावापोटी आजपर्यंत अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. सिडको, हडकोसाठी नक्षत्रवाडीहून खास एक्स्प्रेस लाईन एन-५ पर्यंत टाकण्यात आली आहे. या लाईनचीही अक्षरश: चाळणी करण्यात आली आहे. सिडको-हडकोतील नागरिकांना अत्यंत कमी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. या भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रभारी आयुक्त राम यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली होती. बैठकीत या विभागाचे दु:ख त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर संपूर्ण शहरात चौथ्या दिवशी पाणीपुरवठा झाला पाहिजे असे नियोजन करा, असे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी दुसºया दिवशीपासूनच व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.लोटाकारंजा, किराडपुरा, सिटीचौक, पानदरिबा, मुकुंदवाडी, विठ्ठलनगर, जयभवानीनगर आदी अनेक वसाहतींना पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात चौथ्या दिवशी पाणी देण्याच्या उपक्रमाच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजून नियोजन करण्यात मग्न आहेत.पाच तास पाणीपुरवठाशहरातील अनेक वॉर्डांमध्ये भर उन्हाळ्यातही चार ते पाच तास पाणी देण्याची किमया काही लाईनमन करीत आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही लाईनमन अजिबात ऐकत नाहीत. राजकीय मंडळी सांगतील तेव्हाच पाणी बंद करण्यात येते. प्रत्येक वॉर्डाला एक ते दीड तास पाणी द्यावे, असे आदेश लाईनमनला देण्यात आले आहेत.तीन टाक्यांमध्ये क्लोरिनची कमतरताजायकवाडीपासून शहरात पाणी आणताना अनेक टप्पे पार पाडावे लागतात. या प्रक्रियेत पाण्याचे क्लोरिनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिडको एन-५, एन-७ आणि मरीमाता येथील पाणीपुरवठा केंद्रांवर पाण्यात क्लोरिन अत्यंत नगण्य असल्याचे समोर आले. छावणी प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होताच तिन्ही टाक्यांवरील क्लोरिनचे प्रमाण वाढविण्यात आले.उन्हाळा सुरू होताच शहरातील पाणी प्रश्न हळूहळू पेटत आहे. पाण्याची मागणीही बरीच वाढली आहे. शहरातील अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या. त्यामुळे तातडीने शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपअभियंता एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांची समिती नेमण्यात आली. समितीने शहरातील पाण्याचे १३ नमुने छावणी येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील सिडको एन-५, एन-७ आणि मरीमाता येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.विविध आजारांचा धोकापाण्यातील क्लोरिनचे प्रमाण कमी झाल्यास विविध आजारांचा धोका असतो. मनपाकडून जायकवाडी, नक्षत्रवाडीत पाण्याची तपासणी करण्यात येते. शहरात पाण्याच्या विविध टाक्यांवर अशी सोय नाही. त्यामुळे नक्षत्रवाडीहून येणाºया पाण्यात क्लोरिन किती कमी झाले हे कर्मचाºयांना कळत नाही. कर्मचारी टाकीत पाणी किती आले, किती वॉर्डांना पाणी देता येईल, याचा अंदाज बांधून पाणीपुरवठा करतात.तक्रारी जशास तशाज्या वॉर्डांमध्ये, वसाहतींमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत, त्या तक्रारीनुसार पाणीपुरवठा विभागाने काम सुरू केलेले नाही. अनेक ठिकाणी जलवाहिनीच बदलावी लागेल, या कारणावरून दूषित पाण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुकुंदवाडी, अंबिकानगर, पदमपुरा भागात तर गॅस्ट्रोचे रुग्ण अजूनही सापडतच आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका