शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

औरंगाबाद जिल्ह्यात तरुणांचा जलसमाधीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:39 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पात ५ ते ६ तरुणांनी दुपारी ४ वाजता जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. जिल्हाधिका-यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पात ५ ते ६ तरुणांनी दुपारी ४ वाजता जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. जिल्हाधिका-यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अजय साळुंके, चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम, सोमनाथ मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मन्याड प्रकल्पावर दाखल झाले. यावेळी प्रकल्पाच्या काठावर उभे राहून कार्यक्रर्त्यांनी जलसमाधी आंदोलनला सुरुवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलक कार्यक्रर्त्यांशी चर्चा करून मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत नेऊ, असे आश्वासन देत ज्या काही मागण्या आहेत त्यांचे निवेदन देण्याची मागणी केली.मात्र, जोपर्यंत जिल्हाधिकारी उदय चौधरी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. तसेच दुपारी ४ वाजेपर्यंत वाट पाहू नसता जे घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाºयांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलण्याची व्यवस्था अधिकाºयांनी केली. मात्र, आंदोलकांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत चिकटगाव येथील देवीदास निकम यांच्यासह पाच ते सहा तरुणांनी प्रकल्पात उड्या मारल्या. मात्र, येथे तैनात करण्यात आलेल्या जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, आंदोलक आक्रमक भूमिका घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी मन्याड प्रकल्पावर पोहोचले. त्यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्याकरिता प्रशासन पाठपुरावा करील, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन सायंकाळी ५ वाजता मागे घेण्यात आले.प्रशासनाकडून चोख बंदोबस्तप्रशासनाने सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून सकाळीच प्रकल्पाच्या चोहोबाजूंनी जीवरक्षक दल मन्याड प्रकल्पावर तैनात केले होते. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, वैजापूरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, वीरगावचे पोलीस उपनिरीक्षक अतुल येरमे, शिऊरचे उपनिरीक्षक तांदळे आदींसह पोलीस व महसूलचे अधिकारी आंदोलनावर लक्ष ठेवून होते. यावेळी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन