शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार

By मुजीब देवणीकर | Updated: October 14, 2023 16:24 IST

रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरात पाणीप्रश्न गंभीर वळण घेत आहे. बहुसंख्य वसाहतींना तब्बल १२ दिवसानंतर पाणी मिळत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी विचारणा केली तर तांत्रिक अडचण आहे एवढेच उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेने मागील वर्षी खंडपीठात संपूर्ण शहराला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे शपथपत्र दिले. वर्षभरात एक महिनाही याची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.

हर्सूल तलावातून १४ वॉर्डांना पाणी पुरवठा होतो. दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाक्यांवरून होणारा पाणी पुरवठा तब्बल १२ दिवसांवर गेला आहे. सिडको एन-५ येथील जलकुंभावरून ज्या वसाहतींना पाणी देण्यात येते, त्यांचीही अवस्था आठ ते नऊ दिवसानंतर अशी आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जायकवाडी धरणातून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात येत आहे. हर्सूल तलावातून जवळपास ६ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतोय. त्यानंतरही पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढतच आहे.

बायजीपुऱ्याला आज बाराव्या दिवशी पाणीबायजीपुरा भागाला आज १२ दिवस झाले तरी पाणी मिळालेले नाही. नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली तर बारी कॉलनीचा टप्पा संपल्यावर रात्री उशिरा बायजीपुऱ्याला पाणी देण्यात येईल. एन-५ पाण्याच्या टाकीवर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

पाणी नेमकं मुरतंय कुठे?सिडको एन-५ येथील जलकुंभावरून टँकर भरू नयेत, असा नियम केला होता. अलीकडे काही टँकर पुन्हा येथून पाणी भरू लागले आहेत. किती टँकर रोज भरले जातात, कुठे जातात, याचा कोणताही हिशेब पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

न्यायमूर्तींकडे केली तक्रारमहानगरपालिकेकडून १२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे माजी नगरसेवक माेहसीन अहेमद यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी