शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार

By मुजीब देवणीकर | Updated: October 14, 2023 16:24 IST

रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरात पाणीप्रश्न गंभीर वळण घेत आहे. बहुसंख्य वसाहतींना तब्बल १२ दिवसानंतर पाणी मिळत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी विचारणा केली तर तांत्रिक अडचण आहे एवढेच उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेने मागील वर्षी खंडपीठात संपूर्ण शहराला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे शपथपत्र दिले. वर्षभरात एक महिनाही याची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.

हर्सूल तलावातून १४ वॉर्डांना पाणी पुरवठा होतो. दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाक्यांवरून होणारा पाणी पुरवठा तब्बल १२ दिवसांवर गेला आहे. सिडको एन-५ येथील जलकुंभावरून ज्या वसाहतींना पाणी देण्यात येते, त्यांचीही अवस्था आठ ते नऊ दिवसानंतर अशी आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जायकवाडी धरणातून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात येत आहे. हर्सूल तलावातून जवळपास ६ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतोय. त्यानंतरही पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढतच आहे.

बायजीपुऱ्याला आज बाराव्या दिवशी पाणीबायजीपुरा भागाला आज १२ दिवस झाले तरी पाणी मिळालेले नाही. नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली तर बारी कॉलनीचा टप्पा संपल्यावर रात्री उशिरा बायजीपुऱ्याला पाणी देण्यात येईल. एन-५ पाण्याच्या टाकीवर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

पाणी नेमकं मुरतंय कुठे?सिडको एन-५ येथील जलकुंभावरून टँकर भरू नयेत, असा नियम केला होता. अलीकडे काही टँकर पुन्हा येथून पाणी भरू लागले आहेत. किती टँकर रोज भरले जातात, कुठे जातात, याचा कोणताही हिशेब पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

न्यायमूर्तींकडे केली तक्रारमहानगरपालिकेकडून १२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे माजी नगरसेवक माेहसीन अहेमद यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी