शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार

By मुजीब देवणीकर | Updated: October 14, 2023 16:24 IST

रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरात पाणीप्रश्न गंभीर वळण घेत आहे. बहुसंख्य वसाहतींना तब्बल १२ दिवसानंतर पाणी मिळत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी विचारणा केली तर तांत्रिक अडचण आहे एवढेच उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेने मागील वर्षी खंडपीठात संपूर्ण शहराला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे शपथपत्र दिले. वर्षभरात एक महिनाही याची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.

हर्सूल तलावातून १४ वॉर्डांना पाणी पुरवठा होतो. दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाक्यांवरून होणारा पाणी पुरवठा तब्बल १२ दिवसांवर गेला आहे. सिडको एन-५ येथील जलकुंभावरून ज्या वसाहतींना पाणी देण्यात येते, त्यांचीही अवस्था आठ ते नऊ दिवसानंतर अशी आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जायकवाडी धरणातून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात येत आहे. हर्सूल तलावातून जवळपास ६ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतोय. त्यानंतरही पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढतच आहे.

बायजीपुऱ्याला आज बाराव्या दिवशी पाणीबायजीपुरा भागाला आज १२ दिवस झाले तरी पाणी मिळालेले नाही. नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली तर बारी कॉलनीचा टप्पा संपल्यावर रात्री उशिरा बायजीपुऱ्याला पाणी देण्यात येईल. एन-५ पाण्याच्या टाकीवर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

पाणी नेमकं मुरतंय कुठे?सिडको एन-५ येथील जलकुंभावरून टँकर भरू नयेत, असा नियम केला होता. अलीकडे काही टँकर पुन्हा येथून पाणी भरू लागले आहेत. किती टँकर रोज भरले जातात, कुठे जातात, याचा कोणताही हिशेब पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

न्यायमूर्तींकडे केली तक्रारमहानगरपालिकेकडून १२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे माजी नगरसेवक माेहसीन अहेमद यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी