शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

कचरा कोंडीची ‘वाट’चाल वर्षपूर्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:52 IST

शहरात दररोज जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये दिले. या निधीतून महापालिकेला आजपर्यंत एकही प्रकल्प उभा करता आलेला नाही.

ठळक मुद्देसर्व निविदा पूर्ण : कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अद्याप कागदावरच

औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये दिले. या निधीतून महापालिकेला आजपर्यंत एकही प्रकल्प उभा करता आलेला नाही. कचºयावर प्रक्रिया करणारे सर्व प्रकल्प कागदावरच आहेत. येणाºया काही महिन्यांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहण्याची शक्यताही नाही. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील कचरा कोंडीला वर्षपूर्ती होत आहे, हे विशेष.शहरातील कचºयाची गंभीर अवस्था पाहून राज्य शासनाने क्षणार्धात महापालिकेला ९० कोटी रुपये दिले. या निधीतून पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना केली. महापालिकेने नियोजित केंद्राच्या शेड उभारणीची निविदा काढली. त्यानंतर वाळूज येथील एका कंपनीला प्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले. मागील चार महिन्यांत चिकलठाण्यात शेडच उभे राहिले नाही. पडेगाव येथे काम सुरू करू नये म्हणून राज्य शासनातील एका मंत्र्यानेच स्थगिती आदेश दिला आहे. हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूर येथील कंपनीला दिले आहे. ही निविदा सध्या महापालिकेत वादात सापडली आहे. नक्षत्रवाडीत कचºयापासून गॅस निर्मिती करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिले आहे. चार महिन्यांपूर्वी या कंपनीला काम दिले आहे. अद्यापपर्यंत कंपनीने एकही वाहन शहरात आणले नाही.‘अंदाज’पत्रक चुकीचेशहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचºयावर शास्त्रोक्तपद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने इंदूरच्या ईको प्रो या प्रकल्प सल्लागार संस्थेची नेमणूक केली. या संस्थेने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसारच राज्य शासनाने निधी दिला. आता प्रत्यक्षात काम सुरू केल्यावर अंदाजपत्रकच चुकीचे तयार केल्याचे निदर्शनास येत आहे. कचरा प्रक्रिया केंद्राचे शेड उभारण्यासाठी २४ कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला. आता हे काम तब्बल ५४ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभावचिकलठाणा आणि हर्सूल येथे मागील तीन महिन्यांपासून शेड उभारणीचे काम सुरू आहे. शेड उभारणीत येणाºया छोट्या-मोठ्या अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कुठेच कंत्राटदाराच्या पाठीशी उभे राहत नसल्याचे दिसून येते. शेड उभारणीच्या कामात अनेकदा अडथळा आणण्यात आला. प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न