शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

कचऱ्यावर प्रक्रिया; श्रीगणेशा होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:48 IST

शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकाम ठप्प : औरंगाबाद मनपा प्रशासनाची इच्छाशक्तीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकलठाण्यात शेड कुठे उभा करायचा हेच मनपा प्रशासनाला माहीत नाही. कारण जमिनीची मोजणीच केलेली नाही. मशीन आल्या, शेड उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. चार दिवसांत कचºयावर प्रक्रिया सुरू होणार, अशी भंपकबाजी अधिकारी व पदाधिकाºयांकडून सुरू आहे.१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. येणाºया फेब्रुवारी महिन्यात कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होईल. या एक वर्षात महापालिकेला कचºयाचा प्रश्न १00 टक्के सोडविता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. येणाºया ३ ते ४ महिन्यांत कचºयावर प्रक्रिया करणारी संपूर्ण यंत्रणा उभी राहण्याची शक्यता कमीच आहे. मनपाकडून अद्याप ठोस असे कोणतेच काम सुरू झालेले नाही.चिकलठाण्यात जागेची मोजणीच नाही४चिकलठाण्यात महापालिका दुग्धनगरीच्या आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. दुग्धनगरीची जागा कुठपर्यंत आहे, हे मनपालाच माहीत नाही. आठ दिवसांपासून तालुका भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणी करणार अशा फक्त घोषणा सुरू आहेत. कृती मात्र, शून्य आहे. सध्या तात्पुरत्या शेडचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येतो, तोसुद्धा फोल आहे. बेलिंग, श्रेडिंग मशीन आल्या आहेत. चार दिवसांत प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा पदाधिकाºयांकडून करण्यात येतो.हर्सूलची वस्तुस्थिती अशी४हर्सूल सावंगी तलावाजवळ अगोदर महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात कचरा टाकायचे म्हणून पाय पसरले. मागील पाच महिन्यांपासून येथे शहरातील ओला व सुका मिक्स कचरा नेऊन टाकण्यात येत आहे. ज्याठिकाणी हा कचरा टाकण्यात येतोय त्या पत्र्याच्या शेडची क्षमताही संपली. कचरा ओसंडून शेडबाहेर येत आहे. येथे दीडशे मेट्रिक टन क्षमता असलेले कचरा प्रक्रिया केंद्र उभे करायचे आहे. त्यासाठी शेड उभारणीसाठी मजूर गेल्यावर त्यांना अक्षरश: मारहाण करून पाठवून देण्यात आले.पडेगावला चलेजावचा नारा४पडेगाव येथील कत्तलखान्याच्या जागेवर मनपा १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. येथे काही नागरिकांनी मनपाने आम्हाला भाडेतत्त्वावर जागा दिलीअसल्याचा दावा ठोकला आहे. यासंदर्भातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या जागेवरसंबंधित नागरिक, परिसरातील नागरिक मनपाला पाय ठेवू देत नाहीत. मनपा कर्मचारी, कंत्राटदारांचे मजूर दिल्यास चलेजावचा नारा देण्यात येतो. महापालिका प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न