शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कचऱ्यावर प्रक्रिया; श्रीगणेशा होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:48 IST

शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकाम ठप्प : औरंगाबाद मनपा प्रशासनाची इच्छाशक्तीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकलठाण्यात शेड कुठे उभा करायचा हेच मनपा प्रशासनाला माहीत नाही. कारण जमिनीची मोजणीच केलेली नाही. मशीन आल्या, शेड उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. चार दिवसांत कचºयावर प्रक्रिया सुरू होणार, अशी भंपकबाजी अधिकारी व पदाधिकाºयांकडून सुरू आहे.१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. येणाºया फेब्रुवारी महिन्यात कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होईल. या एक वर्षात महापालिकेला कचºयाचा प्रश्न १00 टक्के सोडविता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. येणाºया ३ ते ४ महिन्यांत कचºयावर प्रक्रिया करणारी संपूर्ण यंत्रणा उभी राहण्याची शक्यता कमीच आहे. मनपाकडून अद्याप ठोस असे कोणतेच काम सुरू झालेले नाही.चिकलठाण्यात जागेची मोजणीच नाही४चिकलठाण्यात महापालिका दुग्धनगरीच्या आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. दुग्धनगरीची जागा कुठपर्यंत आहे, हे मनपालाच माहीत नाही. आठ दिवसांपासून तालुका भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणी करणार अशा फक्त घोषणा सुरू आहेत. कृती मात्र, शून्य आहे. सध्या तात्पुरत्या शेडचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येतो, तोसुद्धा फोल आहे. बेलिंग, श्रेडिंग मशीन आल्या आहेत. चार दिवसांत प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा पदाधिकाºयांकडून करण्यात येतो.हर्सूलची वस्तुस्थिती अशी४हर्सूल सावंगी तलावाजवळ अगोदर महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात कचरा टाकायचे म्हणून पाय पसरले. मागील पाच महिन्यांपासून येथे शहरातील ओला व सुका मिक्स कचरा नेऊन टाकण्यात येत आहे. ज्याठिकाणी हा कचरा टाकण्यात येतोय त्या पत्र्याच्या शेडची क्षमताही संपली. कचरा ओसंडून शेडबाहेर येत आहे. येथे दीडशे मेट्रिक टन क्षमता असलेले कचरा प्रक्रिया केंद्र उभे करायचे आहे. त्यासाठी शेड उभारणीसाठी मजूर गेल्यावर त्यांना अक्षरश: मारहाण करून पाठवून देण्यात आले.पडेगावला चलेजावचा नारा४पडेगाव येथील कत्तलखान्याच्या जागेवर मनपा १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. येथे काही नागरिकांनी मनपाने आम्हाला भाडेतत्त्वावर जागा दिलीअसल्याचा दावा ठोकला आहे. यासंदर्भातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या जागेवरसंबंधित नागरिक, परिसरातील नागरिक मनपाला पाय ठेवू देत नाहीत. मनपा कर्मचारी, कंत्राटदारांचे मजूर दिल्यास चलेजावचा नारा देण्यात येतो. महापालिका प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न