शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 15:37 IST

क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

ठळक मुद्देमागण्या मान्य करण्यासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत माहिती

औरंगाबाद: मराठा समाजाच्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकाना अटक करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आता आठ दिवसांत समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

त्यांनी सांगितले की, क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी आंदोलकाना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान  देणाऱ्या ४२ बांधवांच्या वारसाला प्रत्येकी १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र केवळ बीड जिल्ह्यातील ७ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात आली. उर्वरीत कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, गत सरकारच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेली १३ हजार गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 

मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही

औरंगाबादमधील क्रांतीचौकात १० ऑगस्ट रोजी आंदोलकाना अटक करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आठ दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास थेट मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. पोलीस आम्हाला जेथे अडवतील तेथे ठिय्या देऊ, आमरण उपोषण करू मात्र मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे विविध गट आंदोलन करीत आहेत तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलन का करत नाही असे विचारले असता केरे पाटील आणि कुढेकर म्हणाले की, आम्ही जरी वेगवेगळे आंदोलन करीत असलो तरी आमच्या मागण्या एकच आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार