शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 15:37 IST

क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

ठळक मुद्देमागण्या मान्य करण्यासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत माहिती

औरंगाबाद: मराठा समाजाच्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकाना अटक करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आता आठ दिवसांत समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

त्यांनी सांगितले की, क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी आंदोलकाना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान  देणाऱ्या ४२ बांधवांच्या वारसाला प्रत्येकी १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र केवळ बीड जिल्ह्यातील ७ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात आली. उर्वरीत कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, गत सरकारच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेली १३ हजार गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 

मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही

औरंगाबादमधील क्रांतीचौकात १० ऑगस्ट रोजी आंदोलकाना अटक करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आठ दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास थेट मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. पोलीस आम्हाला जेथे अडवतील तेथे ठिय्या देऊ, आमरण उपोषण करू मात्र मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे विविध गट आंदोलन करीत आहेत तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलन का करत नाही असे विचारले असता केरे पाटील आणि कुढेकर म्हणाले की, आम्ही जरी वेगवेगळे आंदोलन करीत असलो तरी आमच्या मागण्या एकच आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार