शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:36 IST

‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा.'

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या २४ दिंड्यांसोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवक डोक्यावर औषधांचे गाठोडे आणि दैनंदिन वापराचे कपडे घेऊन गुरुवारी वारीला निघाल्याचे पाहायला मिळाले.

आरोग्य विभागाने औषधे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था न केल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संत, महंताच्या २४ दिंड्या वारीला निघाल्या आहेत. या दिंड्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक दिंडीसोबत एक आरोग्यसेवक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. विविध प्रकारची औषधे देण्यात आली. या औषधांच्या साठ्यासह खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराचे कपडेही नेणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी ही औषधे कशी घेऊन जावीत, याची व्यवस्था प्रशासनाने केली नाही. 

आतापासून १२ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना वारीत राहावे लागणार आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने औषधे पावसात भिजू शकतात. मात्र आरोग्य विभागाने वाहन देण्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे स्पष्ट करीत ‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा. १०८ रुग्णवाहिकेची मदत घ्या, तेथील जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवा,’ असे सांगून त्यांना रवाना केले.

नेमणुकीचा आनंद; पण...दिंडीसोबत पायी निघालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिंडीसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने आमची नेमणूक केली, याचा आनंद आहे. मात्र आमचे वय ५०च्या आसपास आहे. औषधांचे गाठोडे डोक्यावर घेऊन आम्ही अन्य वारकऱ्यांप्रमाणे रोज चालू शकत नाही. शिवाय पावसाळा असल्याने औषधे भिजू शकतात. गर्दीत औषधांचा बॉक्स पडू शकतो, याचा विचार प्रशासनाने केला नाही. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022