शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादसह २४ मनपांची प्रभाग रचना नव्याने होणार; नगरविकासच्या निर्णयामुळे पुन्हा खळबळ

By मुजीब देवणीकर | Updated: November 23, 2022 19:38 IST

राज्यातील महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांची निवडणूक लांबत चालली आहे.

औरंगाबाद: औरंगाबादसह राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या / रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग / वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महापालिकेत ९ प्रभागांची तसेच अन्य महापालिकांत वाढीव लोकसंख्येनुसार प्रभागांची रचना करण्यात आली होती. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फायद्यानुसार करण्यात आल्याचा आरोप हाेत होता. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचनाच रद्द करून आधीप्रमाणेच प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई महापालिका प्रभाग रचनेचा विषय सध्या न्यायालयातही सुरू असून, यावर २८ नोव्हेंबरला सुनावणी आहे. दरम्यान, राज्य सरकारने यावर निर्णय होण्याआधीच महापालिका प्रशासनाला प्रभाग, वॉर्डाची संख्या निश्चित करून प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.

नगरविकासच्या निर्णयामुळे पुन्हा खळबळराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे ठेवा’ असे आदेश दिलेले असताना मंगळवारी नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ९२ नगर परिषदांची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले होते. २० जुलै रोजी हा निर्णय झाला होता. या निर्णयासंदर्भात राज्य शासनाने पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. २७ जुलै राेजी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. २८ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू असून, याच दिवशी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे. मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक आदेश काढला. उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी सर्व महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले की, ज्या महापालिकांची मुदत संपली आहे अथवा ज्यांची मुदत संपली, अशा सर्व महापालिकांनी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या निश्चित करून प्रभाग प्रारूप आराखडा तयार करावा. या कामासाठी तत्काळ कारवाई सुरू करावी, असेही आदेशात म्हटले आहे. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. राज्य शासनाच्या विनंतीवरूनच न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवली. आता राज्य शासनच प्रभाग रचनेची तयारी करण्याचे आदेश देत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या पालिकांसाठी नव्याने प्रभाग रचनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, वसई - विरार, पुणे, पिंपरी - चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड - वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी - निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा - भाईंदर या २३ महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील २८पैकी २४ महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार