शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

औरंगाबादसह २४ मनपांची प्रभाग रचना नव्याने होणार; नगरविकासच्या निर्णयामुळे पुन्हा खळबळ

By मुजीब देवणीकर | Updated: November 23, 2022 19:38 IST

राज्यातील महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांची निवडणूक लांबत चालली आहे.

औरंगाबाद: औरंगाबादसह राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या / रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग / वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महापालिकेत ९ प्रभागांची तसेच अन्य महापालिकांत वाढीव लोकसंख्येनुसार प्रभागांची रचना करण्यात आली होती. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फायद्यानुसार करण्यात आल्याचा आरोप हाेत होता. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचनाच रद्द करून आधीप्रमाणेच प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई महापालिका प्रभाग रचनेचा विषय सध्या न्यायालयातही सुरू असून, यावर २८ नोव्हेंबरला सुनावणी आहे. दरम्यान, राज्य सरकारने यावर निर्णय होण्याआधीच महापालिका प्रशासनाला प्रभाग, वॉर्डाची संख्या निश्चित करून प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.

नगरविकासच्या निर्णयामुळे पुन्हा खळबळराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे ठेवा’ असे आदेश दिलेले असताना मंगळवारी नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ९२ नगर परिषदांची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले होते. २० जुलै रोजी हा निर्णय झाला होता. या निर्णयासंदर्भात राज्य शासनाने पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. २७ जुलै राेजी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. २८ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू असून, याच दिवशी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे. मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक आदेश काढला. उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी सर्व महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले की, ज्या महापालिकांची मुदत संपली आहे अथवा ज्यांची मुदत संपली, अशा सर्व महापालिकांनी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या निश्चित करून प्रभाग प्रारूप आराखडा तयार करावा. या कामासाठी तत्काळ कारवाई सुरू करावी, असेही आदेशात म्हटले आहे. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. राज्य शासनाच्या विनंतीवरूनच न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवली. आता राज्य शासनच प्रभाग रचनेची तयारी करण्याचे आदेश देत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या पालिकांसाठी नव्याने प्रभाग रचनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, वसई - विरार, पुणे, पिंपरी - चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड - वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी - निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा - भाईंदर या २३ महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील २८पैकी २४ महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार