शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रभाग आरक्षण सोडत २२ डिसेंबरपर्यंत होणार

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता मनपा निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले आहेत. शहराची बदललेली राजकीय स्थिती आणि एमआयएमचे आगमन यामुळे पालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आराखडे बांधण्यास सुरुवात केली आहे. १९८८ पासून मनपावर सेना-भाजपाचे वर्चस्व आहे. वॉर्ड रचनेवरच राजकीय समीकरणांच्या गोळाबेरजेचा पाया असतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. २०१४ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना व आरक्षण करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास १४० वॉर्डांचे ७० प्रभाग होऊ शकतात. येत्या २० दिवसांमध्ये नकाशांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. २० ते २२ डिसेंबरपर्यंत नवीन होणाऱ्या प्रभागांची आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीनेच रचना व्हावी. यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी स्पष्ट केले. शासन गठीत झाल्यानंतर याप्रकरणी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ४एका वॉर्डात एकच नगरसेवक असला पाहिजे. प्रभागामुळे एकच मतदार दोनवेळा मतदान करील. हे घटनेत बसत नाही. तसेच एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यास त्याचा परिणाम विकासकामांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग पद्धतीला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईला वॉर्ड पद्धत आहे. त्याप्रमाणे येथेही वॉर्ड पद्धत ठेवण्यासाठी पक्षाची मागणी आहे.पालिका प्रशासन सध्या विद्यमान वॉर्डांचे नकाशे तयार करीत आहे. ते काम झाल्यावर प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी तयार करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. १२० वॉर्ड होतील असा २०११ च्या जनगणनेनुसार अंदाज आहे. सध्या लोकसंख्या वाढली आहे. १४० वॉर्ड झाले पाहिजेत. वाढीव लोकसंख्येनुसार ओपन, ओबीसी, महिला, एस.सी.,एस.टी. अशी आरक्षणाची सोडत झाली पाहिजे. ही सोडत जुन्या पद्धतीनेच झाली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह राहील. त्यासाठी केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येईल.