शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण सोडत २२ डिसेंबरपर्यंत होणार

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता मनपा निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले आहेत. शहराची बदललेली राजकीय स्थिती आणि एमआयएमचे आगमन यामुळे पालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आराखडे बांधण्यास सुरुवात केली आहे. १९८८ पासून मनपावर सेना-भाजपाचे वर्चस्व आहे. वॉर्ड रचनेवरच राजकीय समीकरणांच्या गोळाबेरजेचा पाया असतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. २०१४ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना व आरक्षण करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास १४० वॉर्डांचे ७० प्रभाग होऊ शकतात. येत्या २० दिवसांमध्ये नकाशांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. २० ते २२ डिसेंबरपर्यंत नवीन होणाऱ्या प्रभागांची आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीनेच रचना व्हावी. यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी स्पष्ट केले. शासन गठीत झाल्यानंतर याप्रकरणी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ४एका वॉर्डात एकच नगरसेवक असला पाहिजे. प्रभागामुळे एकच मतदार दोनवेळा मतदान करील. हे घटनेत बसत नाही. तसेच एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यास त्याचा परिणाम विकासकामांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग पद्धतीला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईला वॉर्ड पद्धत आहे. त्याप्रमाणे येथेही वॉर्ड पद्धत ठेवण्यासाठी पक्षाची मागणी आहे.पालिका प्रशासन सध्या विद्यमान वॉर्डांचे नकाशे तयार करीत आहे. ते काम झाल्यावर प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी तयार करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. १२० वॉर्ड होतील असा २०११ च्या जनगणनेनुसार अंदाज आहे. सध्या लोकसंख्या वाढली आहे. १४० वॉर्ड झाले पाहिजेत. वाढीव लोकसंख्येनुसार ओपन, ओबीसी, महिला, एस.सी.,एस.टी. अशी आरक्षणाची सोडत झाली पाहिजे. ही सोडत जुन्या पद्धतीनेच झाली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह राहील. त्यासाठी केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येईल.